• gacor777
  • joker123
  • slot gacor
  • slot777
  • slot777
  • सी.ए.ए. अतार्किक, अनैतिक आणि कालविसंगत का आहे?
    •  Home
    • राजकीय
    • सामाजिक
    • सांस्कृतिक
    • English
    • ऑडिओ
    • व्हिडिओ
    • संकीर्ण
    • आमच्याविषयी
    कायदा अनुवाद

    सी.ए.ए. अतार्किक, अनैतिक आणि कालविसंगत का आहे?

    • रामचंद्र गुहा
    • 20 Jan 2020
    • 5 comments

    नागरिकत्व सुधारणा कायद्यामध्ये मोदी सरकारने राजकीय भांडवलाची इतकी मोठी गुंतवणूक कशासाठी केली हे आकलनापलीकडचे आहे. हा कायदा पूर्णतः अतार्किक आहे कारण, सध्या भारतात राहणाऱ्या स्टेटलेस विस्थापितांच्या मोठ्या समूहावर या कायद्याचा परिणाम होणार आहे.  जसे की, श्रीलंकेतील तामिळ - ज्यांच्यापैकी बहुतेक लोक वस्तुतः हिंदूच आहेत. हा कायदा स्पष्टपणे अनैतिकही आहे कारण, त्यातील तरतुदी इस्लाम या एका विशिष्ट धर्माला, सूडबुद्धीने एकटे पाडून वेगळे करत आहेत.

    या कायद्यामागचा युक्तिवाद आणि नैतिकता संशयास्पद आहेच, शिवाय तो लागू करण्यासाठी केलेली सद्यकाळाची निवडही मती गुंग करणारी आहे. ज्या राज्यात मुस्लिम बहुसंख्य आहेत, अशा भारतातील एकमेव राज्याला केंद्रशासित प्रदेश बनवण्याने कलम 370चा अवमान होत नाही का? आणि याने भाजपच्या कडव्या हिंदुत्ववादी घटकांच्या समाधानासाठी आधीच खूप केले गेले आहे, असे नाही का? अयोध्या वाद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्यातील, भव्य राम मंदिर उभे करण्याच्या आदेशानेही त्यांचे समाधान झालेले नाही?  त्यांची लालसा इतकी तीव्र आहे का, की या दोहोंपश्चात इतक्या लगेचच हे तिसरे हाडूक त्यांच्यासमोर भिरकवावे लागते आहे?

    काश्मिरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेणे आणि अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणे या दोन्ही प्रतीकात्मक गोष्टींचे भाजपसाठी अनन्यसाधारण महत्त्व होते. लोकसभेतील सलग दुसऱ्या विजयानंतर हे विषय तडीस लावण्याचा उत्साह मोदी सरकारला का आला, हे कुणालाही समजण्याजोगे आहे. सी.ए.ए. हा कायदा पारित होण्याने केवळ काही हजार स्थलांतरितांनाच भारतीय नागरिकत्व मिळणार आहे असा अंदाज आहे. त्यादृष्टीने हा कायदा फारच कमी महत्त्वाचा आहे. तर मग त्याला इतके प्राधान्य का दिले? आणि तेही अशा वेळी जेव्हा अर्थव्यवस्थेत अराजक माजले आहे, आणि तिचे पुनरुज्जीवन करण्याकडे तात्काळ लक्ष पुरविण्याची गरज आहे.

    नागरिकत्व सुधारणा कायदा अत्यंत अशोभनीय अशा घाईने लोकसभेमध्ये मंजूर करून घेण्यामागे मोदी सरकारची दोन कारणे असावीत – पहिले कारण म्हणजे धर्मांधता. आणि या ‘प्रजासत्ताक’ राष्ट्रातील मुस्लिम नागरिकांनी बहुसंख्य हिंदूंच्या कृपेखाली किंवा दयेखाली इथे राहावे या विचारांची सक्ती त्यांच्यावर लादणे. आणि दुसरे कारण, उन्मत्तपणा. कलम 370 रद्द करण्याला किंवा अयोध्या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला भारतीय मुस्लिम हरकत घेणार नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्याच सरकारने त्यांच्यावर लादलेली ही पाशवी मानखंडना ते निमूटपणे स्वीकारतील हा समज (किंवा भ्रम).

    पण आता ते अंगावर उलटले आहे. कायद्यातील या धोकादायक तरतुदीच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने भारतीय मुस्लिम एकत्र आले आहेत, आणि ही केवळ सुरुवात आहे.  दरम्यान झालेल्या इतर घटना आणि पंतप्रधानांनी केलेली - सर्वार्थाने न पटण्याजोगी – टाळाटाळ, लक्षात घेतली तरी, भारत सरकार आणि विशेषतः गृहमंत्री यांनीच ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबरोबरच नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणीही केली जाईल’ हे पुनःपुन्हा स्पष्ट केले आहे. आणि यामुळे अशी (पूर्णतः वैध) भीती निर्माण झाली आहे की, मुस्लिम समाजाला अशा प्रकारे कोंडीत पकडण्यातून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली जाईल. एन्.आर.सी.मध्ये नागरिकत्व सिद्ध न करू शकलेले मुस्लिमेतर मात्र नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या आधाराने नागरिकत्वासाठी तत्काळ पुन्हा अर्ज करू शकतील.  

    सी.ए.ए. आणि एन.आर.सी. विरोधातील या आंदोलनांचा विशेष उल्लेखण्याजोगा पैलू म्हणजे सर्व धर्मीय लोक यांमध्ये उत्साहाने सहभागी झाले आहेत. कोलकाता, बेंगळुरू, मुंबई आणि दिल्ली अशा शहरांतील हजारो लोकांनी, जे स्वतः मुस्लिम नाहीत - प्रजासत्ताक राष्ट्राच्या स्थापनेतील आदर्श तत्वांना धक्का देणारे - या नव्या कायद्याचे खरे स्वरूप ओळखले आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे निरीक्षण अधिक खरे आहे, ज्यांचा आंदोलनांतील सहभाग आणि त्यांनी केलेले आंदोलनांचे नेतृत्व विशेष उल्लेखनीय आणि प्रभावशाली होते.

    या आंदोलनांविषयीचा दुसरा उल्लेखनीय भाग म्हणजे त्यांनी मिळवलेले जागतिक पातळीवरचे कव्हरेज. याचीही दोन कारणे होती - या आंदोलनांतील विद्यार्थ्यांच्या सहभागाचे व्यापक प्रमाण आणि राज्यसंस्थेने त्याला दिलेल्या प्रतिक्रियेतील अमानुषता. मे 2014पासूनच्या मोदी सरकारच्या कोणत्याही कृतीने या पद्धतीचा विरोध अनुभवला नव्हता. ना नोटबंदीने, ना कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाने. राज्यकर्त्या सत्तेविषयीचा त्यांचा संताप आणि असंतोष व्यक्त करण्यासाठी गेल्या कित्येक आठवड्यांत, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. दिल्लीसारख्या शहरांमध्ये सरकारने सेक्शन 144 लावून, इंटरनेट बंद ठेवून, मेट्रोचे मार्ग बंद ठेवून या आंदोलनांना उतावळेपणाने प्रत्युत्तर दिले. उत्तरप्रदेशसारख्या राज्यात मात्र ते जुलमी स्वरूपाचे होते.

    या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कव्हरेज खूपच व्यापक होते; आणि सर्वत्र ते सारखेच नकारात्मक होते. या कायद्याकडे - तो जसा आहे तसे - भेदभाव करू पाहणारी तरतूद म्हणूनच पाहिले गेले. बहुसंख्याकवादी राष्ट्रांच्या महासागरातील बहुलतावादी दीपस्तंभ म्हणून कित्येक शतके भारताला गौरवले जात असे. आता मात्र असे होणार नाही. आता आपण मुस्लिम पाकिस्तानचे व मुस्लिम बांगलादेशचे अथवा बौद्ध श्रीलंकेचे व बौद्ध म्यानमारचे ‘हिंदू रूप’ म्हणजेच, ‘काही प्रमाणात किंवा पूर्णतः धर्माधारीत बहुसंख्यांकांच्या अनुनयानेच चालवले जाणारे राज्य’ म्हणून ओळखले जाऊ लागलो आहोत. सरकारने आंदोलनांना दिलेल्या निष्ठुर प्रतिसादामुळे देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अधिकच डागाळली आहे. इस्त्राईलसारख्या आपल्या मित्रराष्ट्रामध्येही तेथील नागरिकांना 'भारतात प्रवास करू नका' असा सल्ला देण्यात आला आहे. गोवा आणि आग्रा यांसारख्या ठिकाणचे पर्यटन 50 टक्क्यांहूनही घटले आहे. 

    अयोग्य काळात लागू होणाऱ्या या अतार्किक आणि अनैतिक नागरिकत्व सुधारणा कायद्याने जगातील भारताच्या प्रतिमेला आणि कदाचित पंतप्रधानांच्या प्रतिमेला व परंपरेलाही कलंक लावण्याचे कृत्य केले आहे. मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा परराष्ट्र धोरणाला त्यांनी जे विशेष महत्त्व दिले त्यामुळे तेव्हा प्रस्तुत लेखकासह अनेक जण प्रभावित झाले होते. पंतप्रधानपदाच्या पहिल्या कालखंडात मोदी जगभरच्या नेत्यांच्या भेटी घेत आणि त्यांना मैत्रीचे प्रस्ताव देत अखंड फिरले होते. आंतरराष्ट्रीय व्यवहारांत स्वतःच्या देशाला - आणि स्वतःलाही - मोठे वजन प्राप्त करून देण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा त्यांच्या कृती आणि वक्तव्यांतून दिसत होती. जवाहरलाल नेहरूंपासून - ते स्वतः सोडता - इतर कोणत्याही पंतप्रधानाने परराष्ट्र धोरणांसाठी स्वतःचे इतके व्यक्तिगत भांडवल आणि उर्जा क्वचितच खर्च केली असेल. 

    त्या सर्व परिश्रमांची परिणीती शून्यात झाली आहे. वेडगळपणाने केलेल्या आणि त्यामुळेच अनावश्यक अशा कायद्याच्या एका लहानशा तुकड्याने सर्वच पुसून टाकले आहे. या आंदोलनांविषयीच्या पंतप्रधानाच्या प्रतिक्रियांतून हेच सूचित होते की, सामान्यतः खंबीर भासणारे राज्यकर्तेही स्वतःच स्वतःची फसगत सहजच करून घेतात. समाजमाध्यमांवरच्या तथाकथित महापुरुषांचा पाठिंबा मिळवण्यासाठी 'सी.ए.ए.ला विरोध करण्याऐवजी पाकिस्तानविरोधात निदर्शने करा' असे आंदोलकांना सांगणे जबाबदारपणाचे तर निश्चितच नाही. या सगळ्याने पंतप्रधानांचे नुकसान तर झाले आहेच; मात्र देशाचे झालेले नुकसान त्याहून फार मोठे आहे.
    (अनुवाद : सुहास पाटील)

    - रामचंद्र गुहा  

    Tags: नागरिकत्व सुधारणा विधेयक NRC Protest Amit Shah Narendra Modi CAA एनआरसी आंदोलन अमित शाह नरेंद्र मोदी सीएए जामिया मिल्लिया इस्लामिया अलिगढ विद्यापीठ Jamia Millia Islamia Aligarh University translation suhas patil ramchandra guha रामचंद्र गुहा Load More Tags

    Comments:

    Kiran

    निरपेक्ष

    Aug 14, 2021

    Milind Velhal

    गुहांची मते एकांगी असतात, काँग्रेस धर्जिणी असतात हे स्वतः मान्य करतील नाही करतील, पण मी त्यांचे लिखाण वाचत असल्याने मला माहित आहे. सभ्य भाषेत लिखाण असावे ही किमान अपेक्षा असणे चुकीचे नाही. हिंदुत्व मानणाऱ्याना त्याचे विचार मांडण्याचा गुहांच्या येवढाच अधिकार आहे. या लेखात ते लिहतात ..... अयोध्या वाद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्यातील, भव्य राम मंदिर उभे करण्याच्या आदेशानेही त्यांचे समाधान झालेले नाही? त्यांची लालसा इतकी तीव्र आहे का, की या दोहोंपश्चात इतक्या लगेचच हे तिसरे हाडूक त्यांच्यासमोर भिरकवावे लागते आहे? सर्वोच्च न्याालयाने दिलेल्या निकालाला गुहा एक हाडुक म्हणत असतील आणखी हाडकांची भिरकवण्याची भाषा करीत असतील तर गुहा तुम्ही तुमची बौद्धिक दिवाळखोरी दाखवत आहात. ढोंगी पणे मानवता, बंधुभाव ची ढाल वापरून अल्प संख्य समाजाचा अनुनय करणाऱ्या काँग्रेस पेक्षा तुम्ही अधिक जास्त धोकादायक आहात.राजकारणात असे करावेच लागते असे समर्थन तरी राज्यकर्ते म्हणून काँग्रेस कडे आहे. पण सनदशीर मार्गाने राम मंदिर निकाल, 370 काश्मीर , नागरिकत्वाचा कायद्यातील सुधारणा या तुम्हाला अपेक्षित नसतील , त्या निकलाना हाडुक म्हणणार असाल तर हडुक कोणापुढे फेकायचे असते हे इतिहासकार ला माहीत असणारच ज्या ज्या वेळी नवीन कायदा झाला त्या वेळी संघर्ष झाला, सतीची चाल बंद करायची असो वा 370 असो ., संघर्ष होतोच हे इतिहासकार आम्ही सांगायचे का कारणे काही असोत तुम्हाला हिंदू, हिंदुत्व बद्दल अढी असल्या शिवाय वर्षानुवर्षे तुम्ही त्या विरूद्ध लीहुच शकला नसता. तुम्हाला सलाम आम्ही केला असता जर तुम्ही मुस्लिमांच्या दुटप्पी राष्ट्र निष्टे बद्दल , क्रूर इतिहासाबद्दल , देशाबद्दल त्यांनी करायच्या कर्तव्य वर लिहाले असते

    Aug 14, 2021

    Dr Vijay Zope

    गुहा साहेब, निरपेक्षपणे लिहिणे बहुदा तुम्हाला जमत नाही असे वाटते. कलम 370 रद्द करणे ही काळाची गरज होती. मिलिंद साहेबांनी याबद्दल वर बरेच लिहिले आहे म्हणून जास्त न बोलता एकच सांगतो. हिंदू पर्यटकांना तिथे कसे तुसड्या सारखे वागवतात हे तुम्ही सामान्य नागरिक म्हणून फिरून बघायला पाहिजे. ७० वर्षांनंतर मुस्लिम जास्त कर्मठ होत गेले तर ते तुम्हाला चालत, पण सनदशीर मार्गाने जे कधीच करायला हवे होते ते आता झाले तर मात्र तुम्हाला सलते. अनादी काळापासून एकच सत्य आहे, ते म्हणजे, बदल हा नेहेमीच पचनी पडायला अवघड असतो. लोकशाही मध्ये 300 जागा निवडून देणारे मूर्ख आणि तुम्हीच तेवढे शहाणे. एवढ्या वर्षांनी बहुसंख्य, असे वागायला का प्रवृत्त झाले ह्याची कारमीमांसा अल्पसंख्यांकानी आणि तुमच्यासारख्या सेक्युलर लोकांनी करणे फार गरजेचे आहे. दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना बाकीची बोटे आपल्याकडे दर्शवित असतात हे विसरू नये.

    Aug 14, 2021

    Krushna hambarde

    Very nice analysis of Modi government ambition

    Aug 14, 2021

    Hindurao .S,Pawar

    छान.

    Jan 21, 2020

    Add Comment

    संबंधित लेख

    लेख

    लॉकडाऊन आणि घरगुती हिंसाचारात झालेली वाढ

    अ‍ॅड. प्राची पाटील 04 May 2020
    लेख

    नागरिकत्व विषयक दुरूस्तीचे वास्तव

    सुहास पळशीकर 30 Dec 2019
    व्हिडिओ

    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त मनोगत : डॉ. हमीद दाभोलकर

    हमीद दाभोलकर 20 Aug 2019
    व्हिडिओ

    माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्ती - लक्ष्मीकांत देशमुख यांच्याशी संवाद

    लक्ष्मीकांत देशमुख 09 Aug 2019
    लेख

    आमचे लिंग, आमचा निर्णय, आमचा अधिकार

    रेणुका कड 24 Dec 2019

    लेखकाचे इतर लेख

    अनुवाद

    प्रतिभावंताची प्रशंसा

    रामचंद्र गुहा
    10 Feb 2023
    अनुवाद

    गांधी आजही प्रस्तुत ठरण्यामागची दहा कारणं

    रामचंद्र गुहा
    27 Jan 2023
    लेख

    इयान जॅक यांना आदरांजली

    रामचंद्र गुहा
    05 Nov 2022
    अनुवाद

    राधाकमल मुखर्जी : पर्यावरण क्षेत्रातील अग्रणी

    रामचंद्र गुहा
    23 Oct 2022
    अनुवाद

    मुक्त विचाराचं भय

    रामचंद्र गुहा
    06 Oct 2022
    अनुवाद

    भारताची पंच्याहत्तरी : स्वतंत्र राष्ट्र, पण स्वतंत्र नसलेले लोक

    रामचंद्र गुहा
    24 Aug 2022
    अनुवाद

    एकपक्षीय वर्चस्वाबाबत राजाजी यांनी दिलेला धोक्याचा इशारा

    रामचंद्र गुहा
    26 Apr 2022
    लेख

    1971- आठवणींचा पेटारा

    रामचंद्र गुहा
    31 Aug 2021
    लेख

    युट्युबमुळे मला गवसलेला खजिना... 

    रामचंद्र गुहा
    02 Aug 2021
    अनुवाद

    सत्तेची मुजोरी आणि देशभक्तीचे विनयशील दर्शन

    रामचंद्र गुहा
    03 May 2021
    अनुवाद

    संग्रहालयांच्या आणि पुराभिलेखापालांच्या गौरवार्थ

    रामचंद्र गुहा
    27 Jan 2021
    अनुवाद

    संघ परिवार : एकाधिकारशाहीचा चेहरा असणारी एक सांप्रदायिक संघटना

    रामचंद्र गुहा
    29 Dec 2020
    अनुवाद

    काही आवडते ऑस्ट्रेलिअन क्रिकेटपटू

    रामचंद्र गुहा
    11 Dec 2020
    अनुवाद

    अदानी आफ्टर गांधी

    रामचंद्र गुहा
    28 Nov 2020
    अनुवाद

    ई. एस. रेड्डी : एक महान गांधी-कोश

    रामचंद्र गुहा
    24 Nov 2020
    अनुवाद

    ‘परेडस्’च्या प्रशंसेखातर

    रामचंद्र गुहा
    17 Oct 2020
    अनुवाद

    शास्त्रीजींकडून मोदींना काय शिकता येईल...

    रामचंद्र गुहा
    03 Oct 2020
    अनुवाद

    दुबळे पंतप्रधान अपायकारक,सामर्थ्यशाली पंतप्रधान अधिक अपायकारक!

    रामचंद्र गुहा
    20 Sep 2020
    अनुवाद

    1920 ची इटली आणि 2020 चा भारत यांच्यातील साम्यस्थळे

    रामचंद्र गुहा
    16 Sep 2020
    अनुवाद

    कोरोनाकाळात क्रिकेट पाहताना...

    रामचंद्र गुहा
    30 Aug 2020
    अनुवाद

    कॉंग्रेसमधील घराणेशाही त्या पक्षापेक्षा देशाला अधिक घातक

    रामचंद्र गुहा
    24 Aug 2020
    अनुवाद

    उज्ज्वल भारताच्या ऱ्हासाची कहाणी...

    रामचंद्र गुहा
    17 Aug 2020
    अनुवाद

    काश्मीर - भारताचे लाजीरवाणे सत्य

    रामचंद्र गुहा
    11 Aug 2020
    अनुवाद

    व्यक्तिनिष्ठ पंथांचा संक्षिप्त इतिहास

    रामचंद्र गुहा
    03 Aug 2020
    अनुवाद

    विवेकानंद आणि टागोर या दोघांशी मैत्र साधणारा स्कॉटिश

    रामचंद्र गुहा
    27 Jul 2020
    अनुवाद

    नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधींपेक्षा अधिक धोकादायक का ठरतील...

    रामचंद्र गुहा
    20 Jul 2020
    अनुवाद

    आपली लोकशाही किती अवनत झाली आहे याचे चिन्ह !

    रामचंद्र गुहा
    12 Jul 2020
    अनुवाद

    1939 मध्ये बालाकोटला भेट देणाऱ्या गांधीवादी

    रामचंद्र गुहा
    04 Jul 2020
    अनुवाद

    भारतातील पत्रकारितेच्या स्वातंत्र्याची आजची संकटमय स्थिती

    रामचंद्र गुहा
    27 Jun 2020
    अनुवाद

    इतिहास मोदींना कठोरपणे पारखून घेईल...!

    रामचंद्र गुहा
    14 Jun 2020
    अनुवाद

    कदाचित आपले शास्त्रीय संगीत हाच आपल्या कडव्या राष्ट्रवादावरचा उतारा ठरू शकेल

    रामचंद्र गुहा
    06 Jun 2020
    अनुवाद

    आपल्याला सहा पदरी संकटाचा मुकाबला करायचा आहे

    रामचंद्र गुहा
    25 May 2020
    अनुवाद

    कोरोनाचे संकट हाताळताना झालेल्या चुका मोदी सरकारला कशा सुधारता येतील?

    रामचंद्र गुहा
    17 May 2020
    अनुवाद

    केंद्राकडून राज्यांची पिळवणूक

    रामचंद्र गुहा
    05 May 2020
    अनुवाद

    नवी दिल्लीच्या पुनर्निर्माणासाठीच्या प्रकल्पाचा वेडगळपणा आणि निरर्थकता

    रामचंद्र गुहा
    20 Apr 2020
    अनुवाद

    आपले मनोबल उंचावणाऱ्या दोन स्त्रिया

    रामचंद्र गुहा
    30 Mar 2020
    अनुवाद

    रणजी चषक आणि वृद्ध चाहत्यांच्या प्रेरक आठवणी

    रामचंद्र गुहा
    15 Mar 2020
    अनुवाद

    कॉंग्रेस अध्यक्षाची डेमोक्रेटिक निवड

    रामचंद्र गुहा
    09 Mar 2020
    अनुवाद

    माध्यमांनी दुर्लक्षिलेल्या दोन संस्था

    रामचंद्र गुहा
    24 Feb 2020
    अनुवाद

    अहमदाबादमध्ये गांधींसमवेत

    रामचंद्र गुहा
    08 Feb 2020
    अनुवाद

    प्रजासत्ताकापुढचे चौथे संकट

    रामचंद्र गुहा
    27 Jan 2020
    अनुवाद

    सी.ए.ए. अतार्किक, अनैतिक आणि कालविसंगत का आहे?

    रामचंद्र गुहा
    20 Jan 2020
    अनुवाद

    प्रजासत्ताकाची पुनर्प्राप्ती

    रामचंद्र गुहा
    06 Jan 2020
    अनुवाद

    कट्टरता ही विज्ञानासाठी हुकुमशाहीपेक्षाही अधिक घातक असते!

    रामचंद्र गुहा
    21 Dec 2019
    अनुवाद

    सांप्रदायिकता विरोधाचा इतिहास

    रामचंद्र गुहा
    07 Dec 2019
    अनुवाद

    धार्मिक दंगलींत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांचेही एक स्मारक असावे

    रामचंद्र गुहा
    24 Nov 2019
    अनुवाद

    डॉ. आंबेडकरांच्या चिरकालीन प्रेरणेचा परिणाम

    रामचंद्र गुहा
    09 Nov 2019
    अनुवाद

    भाग्यवान तो देश ज्यास गौरवशाली इतिहास नाही!

    रामचंद्र गुहा
    29 Oct 2019
    अनुवाद

    गांधी विरुद्ध लेनिन: त्यांच्या काळात आणि आपल्या काळात

    रामचंद्र गुहा
    18 Oct 2019
    अनुवाद

    शहरे- गांधींना घडवणारी आणि गांधींनी घडवलेली

    रामचंद्र गुहा
    03 Oct 2019

    या आठवड्यातील लेख

    परिचय

    मुस्लीम मराठी साहित्याच्या दालनातील नव्या अभिव्यक्तीची कविता

    हरिश नवले
    22 Mar 2023
    ऑडिओ

    रभाजी कडलग

    संतोष पद्माकर पवार
    21 Mar 2023
    ऑडिओ

    'तात्पर्य'मधील पहिली कथा : आदर्श

    अवधूत डोंगरे
    20 Mar 2023
    लेख

    दलवाईंचा वैचारिक वारसा हेच मंडळाचे बलस्थान

    शमसुद्दीन तांबोळी
    19 Mar 2023
    Article

    It’s a Digital Dilemma Too

    Yogesh Borate
    17 Mar 2023
    व्हिडिओ

    'विज्ञानाने मला काय दिले?' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभातील भाषण

    विवेक सावंत
    10 Mar 2023
    व्हिडिओ

    डॉ. नरेंद्र दाभोलकर चित्र,शिल्प,कला प्रदर्शनात लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलेले भाषण 

    लक्ष्मीकांत देशमुख
    09 Mar 2023

    लोकप्रिय लेख इतर सर्व

    व्यक्तिवेध

    गुड बाय सानिया!

    आ. श्री. केतकर
    03 Mar 2023
    व्हिडिओ

    वैज्ञानिक सत्य

    विनोद शिरसाठ
    01 Mar 2023
    व्हिडिओ

    'धर्मरेषा ओलांडताना'च्या निमित्ताने हिनाकौसर खान यांच्याशी संवाद

    हिनाकौसर खान
    27 Feb 2023
    लेख

    भारतातील ट्रॅमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

    आ. श्री. केतकर
    24 Feb 2023
    लेख

    ‘बीबीसी’ आणि ‘फॉरेन हँड’!

    दिलीप लाठी
    23 Feb 2023

    साधना साप्ताहिकाचा ताजा अंक

    18 मार्च 2023 चा अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा..


    साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा

    साधना साप्ताहिकाचे डिटेल्स पाहण्यासाठी क्लिक करा...

    जाहिरात

    'केशवरावांच्या मुलाखती' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'देव तेथेचि जाणावा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'आम्हा घरी धन' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'असिधारा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'तीन संपादकांच्या मुलाखती' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'धर्मरेषा ओलांडताना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

    'सावध ऐका पुढल्या हाका' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    Tags

    • मुलाखत
    • दीर्घलेख
    • रिपोर्ताज
    • इंग्लिश
    • शेती
    • आरोग्य
    • शिक्षण
    • लेख
    • ऑडिओ
    • व्हिडिओ
    • विज्ञान
    • लेखमाला

    साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...

    वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1100, 2100, 3000 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
    020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.

    weeklysadhana@gmail.com
    • वर्गणी
    • जाहिरात
    • देणगी
    • प्रतिसाद
    • चौकशी
    • पॉलिसी
    • नियम आणि अटी

    © 2019, Evonix Technologies Pvt. Ltd All rights reserved

    कृपया आम्हाला अभिप्राय द्या

    Welcome :

    Search Here....