• gacor777
  • joker123
  • slot gacor
  • slot777
  • slot777
  • राधाकमल मुखर्जी : पर्यावरण क्षेत्रातील अग्रणी
    •  Home
    • राजकीय
    • सामाजिक
    • सांस्कृतिक
    • English
    • ऑडिओ
    • व्हिडिओ
    • संकीर्ण
    • आमच्याविषयी
    पर्यावरण अनुवाद

    राधाकमल मुखर्जी : पर्यावरण क्षेत्रातील अग्रणी

    80 वर्षांपूर्वी मुखर्जी यांनी दिलेले धोक्याचे इशारे आज लक्षात घेण्याजोगे ठरतात.

    • रामचंद्र गुहा
    • 23 Oct 2022
    • 1 comments

    telegraphindia.com

    माणूस व नैसर्गिक विश्व यांचं परस्परावलंबन, जीवनाचं चक्र आणि या चक्राशी अविचारीपणे केलेली छेडछाड किती धोकादायक असू शकते, या मुखर्जींच्या निबंधात येणाऱ्या कल्पना आता पर्यावरणविषयक अभ्यासक व कार्यकर्ते यांच्यासाठी चिरपरिचित झालेल्या आहेत. पण 1930च्या दशकात हे लिहिणं दूरदर्शीपणाचं, किंबहुना राधाकमल मुखर्जी यांना अग्रणी ठरवणारं मानावं लागेल. मुखर्जी संयम व जबाबदारी यांनी घडलेल्या नीतिमत्तेचा कैवार घेत होते. आपल्या वाढीला व विस्ताराला कोणतीही नैसर्गिक मर्यादा न मानणाऱ्या, आणि वेगाने नागरीकरण व औद्योगिकीकरण घडवणाऱ्या समाजाच्या मूळ प्रेरणेविरोधात जाणारी ही मांडणी होती.

    1922 मध्ये लखनौ विद्यापीठातील एक प्राध्यापक राधाकमल मुखर्जी यांनी ‘प्रिन्सिपल्स ऑफ कम्पॅरिटिव्ह इकॉनॉमिक्स’ या नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं. नैसर्गिक पर्यावरणाचा भारतीय गावांमधील सामाजिक व आर्थिक जीवनावर कोणता परिणाम होतो, याकडे शंभर वर्षांपूर्वीच्या या पुस्तकात ज्या तऱ्हेने लक्ष दिलं आहे, ते वाचताना थक्क व्हायला होतं. शेती टिकून राहण्यासाठी सामायिक मालमत्तेमधील संसाधनं किती महत्त्वाची आहेत, याची जाणीव झालेले मुखर्जी हे बहुधा पहिले भारतीय अभ्यासक असावेत. लागवडीखालील जमिनीवर व्यक्तींची अथवा कुटुंबांची मालकी होती, पण कालवे वहिवाटीखाली येत होते आणि त्यांचं व्यवस्थापन संपूर्ण गावाकडून केलं जात असे, त्याचप्रमाणे झाडं व कुरणं यांचीही मालकी सामायिक होती. तर, मुखर्जी लिहितात त्याप्रमाणे, ‘खासगी मालमत्ता उर्वरित समुदायाहून वरचढ ठरणारा विशेषाधिकार बहाल करणारी असली, तरी अशा मालकीचा वापर कधीच पूर्णतः अनन्य स्वामित्वाच्या स्वरूपात केला जात नव्हता.’

    वसाहतपूर्व काळातील भारतीय गावामध्ये सिंचन कालव्यांवरील सामूहिक मालकी व त्यांचा सामूहिक वापर सर्वाधिक लक्षणीय होता. सिंचनाच्या व्यवस्थापनामुळे ‘माणसांना समाजविघातक व्यक्तिवाद सोडावा लागतो, किंवा परिणाम भोगावे लागतात,... अशा व्यवस्थापनामुळे माणसांना इतर माणसांशी जवळचे आर्थिक संबंध राखणं भाग पडत होतं.’ तर, ‘भारतीय ग्रामसमुदायांमध्ये शेतकऱ्यांचे परस्पर अधिकार टाळण्यासाठी पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म सामुदायिक संबंध अस्तित्वात होते. मालमत्तेचा जुलमी वापर टाळण्यासाठी भारताने तलावांवर आणि सिंचनाचं वाटप करणाऱ्या कालव्यांवर एक प्रकारची सामुदायिक मालकी प्रस्थापित करायचा प्रयत्न केला आहे- सिंचन हे कृषी उत्पादनामधील सर्वांत महत्त्वाचं साधन आहे.”

    सामायिक मालमत्ता व्यवस्थापनाच्या या एतद्देशीय व्यवस्थांखाली ब्रिटिश वासाहतिक राजवटीने सुरुंग लावला. सरकारी वन विभागाने वृक्षाच्छादित प्रदेश ताब्यात घेतले, त्यांचा व्यापारी उद्देशाने वापर सुरू केला आणि उपजीविकेसाठी त्यांचा वापर करू पाहणाऱ्या गावकऱ्यांना गुन्हेगार ठरवले. तलाव आणि कालवेसुद्धा सरकारी विभागाखाली आणण्यात आले, आणि त्यांच्या देखरेखीची जबाबदारी सरकारनियुक्त अधिकाऱ्यांकडे देण्यात आली. हा बदल ‘सार्वजनिक कामांसंदर्भात लोकांमधील उपक्रमशीलतेचं पूर्ण खच्चीकरण करणारा ठरला... आधी एतद्देशीय यंत्रणेद्वारे या कामांची देखभाल केली जात होती. पण पारंपरिक वा सकारात्मक जबाबदारीचा व अधिकाराचा पूर्ण अभाव असल्यामुळे ही यंत्रणा निष्क्रिय व नादुरुस्त झाली आहे,’ असं मुखर्जी लिहितात.


    हेही वाचा : पत्रकारिता मला फारच शक्तिशाली शस्त्र वाटतं! - इस्मत आरा (युवा दिवाळी अंक 2022)


    आज राधाकमल मुखर्जी हे बहुतांशाने विस्मृतीत गेलेलं व्यक्तिमत्व आहे. परंतु, त्यांचं लेखन आज भारतासमोर व जगासमोर उभ्या असलेल्या पर्यावरणविषयक संकटाविषयी थेट बोलणारं आहे. ‘सोशिऑलॉजिकल रिव्ह्यू’ या नियतकालिकात 1930 मध्ये प्रकाशित झालेला ‘अ‍ॅन इकॉलॉजिकल अप्रोच टू सोशिऑलॉजी’ हा लेख पाहा. पारंपरिक सामाजिक विज्ञानाने ‘जवळपास पूर्णपणे माणसाचे माणसावर कोणते परिणाम होतात याचीच चिंता केली आहे; झाडं व प्राणी, जमीन व पाणी यांची कायमच उपेक्षा झालेली आहे,’ असं प्रतिपादन या लेखात करण्यात आलं होतं. ‘या निखळ मानवी प्रभावांपेक्षा इतिहास व अर्थशास्त्र यांना अवाजवी महत्त्व दिलं जातं,’ अशी टिप्पणी मुखर्जी करतात. दुसऱ्या बाजूला, भूगोलशास्त्रज्ञ व पर्यावरणशास्त्रज्ञ ‘समाजाच्या संदर्भात भौतिक पर्यावरणाचं महत्त्व काय असतं, आणि विशेषतः व्यवसाय व कौटुंबिक जीवन यांच्यावर पर्यावरणाचे कोणते परिणाम होतात, यावर स्पष्ट भर देतात.’ तर, मुखर्जी यांनी त्यांच्या समकालीन समाजशास्त्रज्ञांना सांगितल्याप्रमाणे, ‘विशिष्ट प्रदेशात विशिष्ट काळामध्ये निर्माण झालेल्या भिन्न वनस्पती व प्राणी यांच्या नैसर्गिक रचनेमध्ये माणसांच्या व प्राण्यांच्या लोकसंख्येमुळे कोणता गोंधळ निर्माण होतो, याकडे लक्ष देणारा वनस्पती व प्राणी या संदर्भातील पर्यावरणशास्त्राचा एक महत्त्वाचा घटक आहे.’ स्वतःच्या मायभूमीसंदर्भात मुखर्जी लिहितात की, ‘माणसाकडील पाळीव प्राण्यांच्या अति चरण्यामुळे व त्यांनी पायदळी तुडवल्यामुळे वनस्पतींचं आच्छादन पूर्णतः नष्ट झालं आहे आणि भारताच्या नदीपात्रांमधील बारमाही व हंगामी रानटी झुडपंही लुप्त झाली आहेत.’

    निसर्गाच्या रचनेमध्ये सुधारणा करण्याची व त्याला नवा आकार देण्याची अभूतपूर्व क्षमता माणसांमध्ये होती. त्यांनी वनं साफ करण्यासाठी, शेतीसाठी, गायीगुरं पाळण्यासाठी वापरलेल्या पद्धती, आणि परदेशी वनस्पती भारतात व इतरत्र आणल्यामुळे ‘प्राथमिक व दुय्यम घटनांची एक मालिकाच सुरू झाली, त्यात वनस्पतींच्या प्रजातींची व समुदायांची अख्खी मालिकाच नष्ट झाली.’ ही ढवळाढवळ थोपवली नाही, तर त्यातून मूल्यवान वनस्पती व प्राणी प्रजाती नष्ट होतील, मातीची सुपीकता कमी होईल, वृक्षतोड होईल, निर्जनीकरण होईल, दुष्काळ पडेल आणि त्या प्रदेशातील मानवी जीवनाच्या भरभराटीच्या शक्यता धोक्यात येतील.

    माणूस व नैसर्गिक विश्व यांचं परस्परावलंबन, जीवनाचं चक्र आणि या चक्राशी अविचारीपणे केलेली छेडछाड किती धोकादायक असू शकते, या मुखर्जींच्या निबंधात येणाऱ्या कल्पना आता पर्यावरणविषयक अभ्यासक व कार्यकर्ते यांच्यासाठी चिरपरिचित झालेल्या आहेत. पण 1930च्या दशकात हे लिहिणं दूरदर्शीपणाचं, किंबहुना राधाकमल मुखर्जी यांना अग्रणी ठरवणारं मानावं लागेल. मुखर्जी संयम व जबाबदारी यांनी घडलेल्या नीतिमत्तेचा कैवार घेत होते. आपल्या वाढीला व विस्ताराला कोणतीही नैसर्गिक मर्यादा न मानणाऱ्या, आणि वेगाने नागरीकरण व औद्योगिकीकरण घडवणाऱ्या समाजाच्या मूळ प्रेरणेविरोधात जाणारी ही मांडणी होती.

    राधाकमल मुखर्जी यांनी 1934 मध्ये ‘इंडियन जर्नल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये एक लेख प्रकाशित केला. पर्यावरणाच्या स्थितीमुळे उपजीविकेच्या रूपांवर कोणते निर्बंध आले आहेत, याबद्दल सहअभ्यासकांना इशारा देण्यासाठी त्यांनी हा लेख लिहिला होता. निसर्गनियमांना क्षुल्लक मानल्याचे आर्थिक कारभारावर धोकादायक परिणाम होऊ शकतात, असं प्रतिपादन त्यांनी या लेखात केलं. ‘द ब्रोकन बॅलन्स ऑफ पॉप्युलेशन, लँड अँड वॉटर’ असं या लेखाचं अर्थवाही शीर्षक होतं. सिंधू व गंगा नद्यांकाठच्या मैदानी प्रदेशातील वनं व कुरणं नष्ट झाली, त्यातून शेतीसाठी व निवासासाठी अनुरूप नसलेला दरीचा विस्तृत प्रदेश निर्माण होत होता, तसंच त्यामुळे पाऊस कमी प्रमाणात व अनिश्चितपणे पडू लागला, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. यातून पाण्याचा व चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आणि गायीगुरांवर त्याचा गंभीर परिणाम होणार होता; या प्राण्यांचा आकार आता लहान झाला होता व ते दुबळे झाले होते, गायी-म्हशी कमी दूध देऊ लागल्या आणि शेतात काम करण्यासाठी हे प्राणी कमी इच्छुक दिसू लागले. ‘भविष्यात कधीतरी गंगा खोऱ्याची गतसुद्धा सिंधू खोऱ्यासारखीच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रदेशांमध्ये एकेकाळी संपन्नता होती. सिंधू नदीच्या पूर्वेला निर्जन प्रदेशात प्राचीन नदीपात्रांच्या व मातीखाली गाडल्या गेलेल्या शहरांच्या खुणा दिसतात, त्यातून एकेकाळी सुपीक असलेल्या प्रदेशाचं टप्प्याटप्प्याने निर्जनीकरण कसं झालं हेच स्पष्ट होतं,’ असं मुखर्जींनी लिहिलं होतं. 

    आजच्या अकादमिक अभ्यासकांप्रमाणे राधाकमल मुखर्जी केवळ मर्यादित विषयातले तज्ज्ञ नव्हते. विद्याशाखीय मर्यादांचं बंधन त्यांना नव्हतं, त्यांचं लेखन इतिहास व तत्त्वज्ञान यांच्यासोबतच अर्थशास्त्र व समाजशास्त्र अशा व्यापक विषयांना स्पर्श करत जाणारं आहे. इतर भारतीय अर्थशास्त्रज्ञांहून वेगळी वाट चोखाळणाऱ्या मुखर्जी यांना नैसर्गिक विज्ञानांमध्ये, विशेषतः त्या वेळी नव्यानेच येऊ घातलेल्या पर्यावरणशास्त्रामध्ये खूप रस होता. मुखर्जी यांच्या निधनानंतर संकलित करण्यात आलेली त्यांच्या प्रकाशित साहित्याची यादी पाहिली, तर त्यात 47 पुस्तकं आढळतात, त्यातील विषयांची व्याप्ती असाधारण आहे. ‘द फाउंडेशन्स ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स’ (1916) हे त्यांचं पहिलं पुस्तक होतं, त्यानंतरच्या काळातील ‘रिजनल सोशिऑलॉजी’ (1926), ‘द चेंजिंग फेस ऑफ बंगाल’ (1938) व ‘सोशल इकॉलॉजी’ (1940), आणि ‘द इंडियन वर्किंग क्लास’ (1945), ‘द सोशल फंक्शन ऑफ आर्ट’ (1948), ‘द सोशल स्ट्रक्चर ऑफ व्हॅल्यूज्’ (1949) व ‘द डायनॅमिक्स ऑप मोराल्स’ (1951), ‘द हिस्ट्री ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन’ (दोन खंड, 1956), ‘द फिलॉसॉफी ऑफ सोशल सायन्स’ (1960), व ‘द फ्लॉवरिंग ऑफ इंडियन आर्ट’ (1964) या त्यांच्या पुस्तकांच्या नावांवरून विषयांमधील वैविध्याचा अंदाज येतो.

    मुखर्जी यांचं बरंच लेखन वरवरचं व तात्कालिक होतं. उदाहरणार्थ, भारतीय कलेतिहासामधील त्यांच्या योगदानाची आठवण आज कोणी ठेवत नाही. व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांमध्ये किंवा व्यावसायिक समाजशास्त्रज्ञांमध्येही त्यांचं लेखन फारसं वाचलं जात नाही. परंतु, मानवी पर्यावरणशास्त्राच्या क्षेत्रात मात्र त्यांचं स्थान खऱ्या अर्थाने अग्रणी आहे, आणि या विषयावरील अथवा त्या संदर्भातील त्यांचं बहुतांश लेखन टिकाऊ मूल्य राखणारं आहे.

    राधाकमल मुखर्जी यांना अभ्यासामुळे जीवनाच्या जाळ्यातील सूक्ष्म गुंतागुंतीचं सखोल ज्ञान प्राप्त झालं होतं आणि या व्यामिश्र रचनेविषयी त्यांना अत्यंत आदरही वाटत होता. ते पर्यावरणवादाच्या जन्मापूर्वीचे पर्यावरणवादी होते; या विषयांवर चिकित्सक अभ्यासाचा शोध लागला नव्हता, किंबहुना तसा विचारही केला गेला नव्हता, तेव्हा मुखर्जींनी केलेलं काम त्यांना ‘पर्यावरणीय समाजशास्त्रज्ञ’ व ‘पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञ’ ही संबोधनं देणारं ठरतं. ‘अर्थशास्त्राच्या व समाजशास्त्राच्या नियमांनी जीवनातील समतोलाच्या अधिक सर्वांगीण नियमांना सहायक ठरायला हवं,’ असं विधान मुखर्जींनी एकदा केलं होतं. अभ्यासकांनी बौद्धिक कारणांसाठी निसर्गाकडे अधिक लक्ष देण्याची गरज होती; तर, नागरिकांनी निव्वळ टिकून राहण्यासाठी नैसर्गिक मर्यादांकडे अधिक लक्ष देण्याची गरज होती. मुखर्जींच्या काळात वेगवान आर्थिक वृद्धी साधली जात होती, आणि पर्यावरणीय मर्यादांची काहीच फिकीर केली जात नव्हती; तरीही प्रवाहाविरोधात जात मुखर्जींनी असं प्रतिपादन केलं की, ‘निसर्गाच्या असाधारण संथ पद्धतींचं काही प्रमाणात अनुकरण’ माणसांनी केलं तर चांगलं होईल. ‘माणूस अनेकदा अजाणतेपणामुळे वा स्वार्थीपणामुळे नैसर्गिक वीण उसवतो, पण सामाजिक प्रगती साधायची असेल तर निःसंशयपणे निसर्गाच्या व समाजाच्या शक्तींची सहसंबंधांच्या व ऐक्याच्या अधिकाधिक सूक्ष्म आकृतिबंधांनी वीण घालणं आवश्यक आहे. जीवनाच्या जाळ्यातील सूक्ष्म गुंतागुंतीविषयीचं ज्ञान व आदर याच गोष्टी माणसाला सर्वोच्च नियतीपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतील,’ असं त्यांनी लिहिलं होतं.

    ‘उपयोजित मानवी पर्यावरणशास्त्र ही शाश्वत सभ्यतेची एकमेव हमी आहे,’ अशी टिप्पणी मुखर्जी यांनी 1938 मधल्या एका पुस्तकात केली होती. ‘पर्यावरणासंदर्भातील तडजोड उस्फूर्ततेच्या पातळीवरून नैतिकतेच्या पातळीपर्यंत आणली जाईल’ त्या दिवसाची आपण वाट पाहत असल्याचं त्यांनी नोंदवलं आहे. माणसांनी ‘सर्व पर्यावरणीय शक्तींशी सलोखा साधावा... तात्कालिक स्वरूपाची व दूरगामी परिणाम करणारी शोषणकारी कामं थोपवण्यासाठी नवीन मूल्यं रुजवावीत- उद्याचा विचार करावा, या प्रदेशातील अजून जन्माला न आलेल्या रहिवाशांसाठी काय त्याग करणं गरजेचं आहे याचा विचार करावा,’ अशी विनवणी त्यांनी केली होती. 80 वर्षांपूर्वी दिलेले हे धोक्याचे इशारे आज आठवणीत ठेवण्याजोगे आणि लक्षात घेण्याजोगे ठरतात.

    अनुवाद: प्रभाकर पानवलकर

    - रामचंद्र गुहा, बंगळूरू
    ramachandraguha@yahoo.in

    Tags: Economics Social Impact Agriculture Agriculture Sector Sociology रामचंद्र गुहा मराठी लेख Load More Tags

    Comments:

    Anup Priolkar Goa

    Nice presentation of nature's roll on human being.

    Oct 24, 2022

    Add Comment

    संबंधित लेख

    अनुवाद

    राधाकमल मुखर्जी : पर्यावरण क्षेत्रातील अग्रणी

    रामचंद्र गुहा 23 Oct 2022
    लेख

    विकास व्हावा, पण 'अशा' पद्धतीनं नको!

    आ. श्री. केतकर 08 Sep 2022
    लेख

    पावसाचे अंदाज जेव्हा चुकतात...

    रावसाहेब पुजारी 27 Jun 2022
    लेख

    पृथ्वी आणि अंतराळाला जोडणारा चमत्कार - लोणार सरोवर

    डॉ. विशाल इंगोले 05 Jun 2021
    लेख

    टिपेश्वर अभयारण्य: एक थरारक अनुभव (पूर्वार्ध)

    माणिक पुरी 04 Jun 2021

    लेखकाचे इतर लेख

    अनुवाद

    प्रतिभावंताची प्रशंसा

    रामचंद्र गुहा
    10 Feb 2023
    अनुवाद

    गांधी आजही प्रस्तुत ठरण्यामागची दहा कारणं

    रामचंद्र गुहा
    27 Jan 2023
    लेख

    इयान जॅक यांना आदरांजली

    रामचंद्र गुहा
    05 Nov 2022
    अनुवाद

    राधाकमल मुखर्जी : पर्यावरण क्षेत्रातील अग्रणी

    रामचंद्र गुहा
    23 Oct 2022
    अनुवाद

    मुक्त विचाराचं भय

    रामचंद्र गुहा
    06 Oct 2022
    अनुवाद

    भारताची पंच्याहत्तरी : स्वतंत्र राष्ट्र, पण स्वतंत्र नसलेले लोक

    रामचंद्र गुहा
    24 Aug 2022
    अनुवाद

    एकपक्षीय वर्चस्वाबाबत राजाजी यांनी दिलेला धोक्याचा इशारा

    रामचंद्र गुहा
    26 Apr 2022
    लेख

    1971- आठवणींचा पेटारा

    रामचंद्र गुहा
    31 Aug 2021
    लेख

    युट्युबमुळे मला गवसलेला खजिना... 

    रामचंद्र गुहा
    02 Aug 2021
    अनुवाद

    सत्तेची मुजोरी आणि देशभक्तीचे विनयशील दर्शन

    रामचंद्र गुहा
    03 May 2021
    अनुवाद

    संग्रहालयांच्या आणि पुराभिलेखापालांच्या गौरवार्थ

    रामचंद्र गुहा
    27 Jan 2021
    अनुवाद

    संघ परिवार : एकाधिकारशाहीचा चेहरा असणारी एक सांप्रदायिक संघटना

    रामचंद्र गुहा
    29 Dec 2020
    अनुवाद

    काही आवडते ऑस्ट्रेलिअन क्रिकेटपटू

    रामचंद्र गुहा
    11 Dec 2020
    अनुवाद

    अदानी आफ्टर गांधी

    रामचंद्र गुहा
    28 Nov 2020
    अनुवाद

    ई. एस. रेड्डी : एक महान गांधी-कोश

    रामचंद्र गुहा
    24 Nov 2020
    अनुवाद

    ‘परेडस्’च्या प्रशंसेखातर

    रामचंद्र गुहा
    17 Oct 2020
    अनुवाद

    शास्त्रीजींकडून मोदींना काय शिकता येईल...

    रामचंद्र गुहा
    03 Oct 2020
    अनुवाद

    दुबळे पंतप्रधान अपायकारक,सामर्थ्यशाली पंतप्रधान अधिक अपायकारक!

    रामचंद्र गुहा
    20 Sep 2020
    अनुवाद

    1920 ची इटली आणि 2020 चा भारत यांच्यातील साम्यस्थळे

    रामचंद्र गुहा
    16 Sep 2020
    अनुवाद

    कोरोनाकाळात क्रिकेट पाहताना...

    रामचंद्र गुहा
    30 Aug 2020
    अनुवाद

    कॉंग्रेसमधील घराणेशाही त्या पक्षापेक्षा देशाला अधिक घातक

    रामचंद्र गुहा
    24 Aug 2020
    अनुवाद

    उज्ज्वल भारताच्या ऱ्हासाची कहाणी...

    रामचंद्र गुहा
    17 Aug 2020
    अनुवाद

    काश्मीर - भारताचे लाजीरवाणे सत्य

    रामचंद्र गुहा
    11 Aug 2020
    अनुवाद

    व्यक्तिनिष्ठ पंथांचा संक्षिप्त इतिहास

    रामचंद्र गुहा
    03 Aug 2020
    अनुवाद

    विवेकानंद आणि टागोर या दोघांशी मैत्र साधणारा स्कॉटिश

    रामचंद्र गुहा
    27 Jul 2020
    अनुवाद

    नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधींपेक्षा अधिक धोकादायक का ठरतील...

    रामचंद्र गुहा
    20 Jul 2020
    अनुवाद

    आपली लोकशाही किती अवनत झाली आहे याचे चिन्ह !

    रामचंद्र गुहा
    12 Jul 2020
    अनुवाद

    1939 मध्ये बालाकोटला भेट देणाऱ्या गांधीवादी

    रामचंद्र गुहा
    04 Jul 2020
    अनुवाद

    भारतातील पत्रकारितेच्या स्वातंत्र्याची आजची संकटमय स्थिती

    रामचंद्र गुहा
    27 Jun 2020
    अनुवाद

    इतिहास मोदींना कठोरपणे पारखून घेईल...!

    रामचंद्र गुहा
    14 Jun 2020
    अनुवाद

    कदाचित आपले शास्त्रीय संगीत हाच आपल्या कडव्या राष्ट्रवादावरचा उतारा ठरू शकेल

    रामचंद्र गुहा
    06 Jun 2020
    अनुवाद

    आपल्याला सहा पदरी संकटाचा मुकाबला करायचा आहे

    रामचंद्र गुहा
    25 May 2020
    अनुवाद

    कोरोनाचे संकट हाताळताना झालेल्या चुका मोदी सरकारला कशा सुधारता येतील?

    रामचंद्र गुहा
    17 May 2020
    अनुवाद

    केंद्राकडून राज्यांची पिळवणूक

    रामचंद्र गुहा
    05 May 2020
    अनुवाद

    नवी दिल्लीच्या पुनर्निर्माणासाठीच्या प्रकल्पाचा वेडगळपणा आणि निरर्थकता

    रामचंद्र गुहा
    20 Apr 2020
    अनुवाद

    आपले मनोबल उंचावणाऱ्या दोन स्त्रिया

    रामचंद्र गुहा
    30 Mar 2020
    अनुवाद

    रणजी चषक आणि वृद्ध चाहत्यांच्या प्रेरक आठवणी

    रामचंद्र गुहा
    15 Mar 2020
    अनुवाद

    कॉंग्रेस अध्यक्षाची डेमोक्रेटिक निवड

    रामचंद्र गुहा
    09 Mar 2020
    अनुवाद

    माध्यमांनी दुर्लक्षिलेल्या दोन संस्था

    रामचंद्र गुहा
    24 Feb 2020
    अनुवाद

    अहमदाबादमध्ये गांधींसमवेत

    रामचंद्र गुहा
    08 Feb 2020
    अनुवाद

    प्रजासत्ताकापुढचे चौथे संकट

    रामचंद्र गुहा
    27 Jan 2020
    अनुवाद

    सी.ए.ए. अतार्किक, अनैतिक आणि कालविसंगत का आहे?

    रामचंद्र गुहा
    20 Jan 2020
    अनुवाद

    प्रजासत्ताकाची पुनर्प्राप्ती

    रामचंद्र गुहा
    06 Jan 2020
    अनुवाद

    कट्टरता ही विज्ञानासाठी हुकुमशाहीपेक्षाही अधिक घातक असते!

    रामचंद्र गुहा
    21 Dec 2019
    अनुवाद

    सांप्रदायिकता विरोधाचा इतिहास

    रामचंद्र गुहा
    07 Dec 2019
    अनुवाद

    धार्मिक दंगलींत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांचेही एक स्मारक असावे

    रामचंद्र गुहा
    24 Nov 2019
    अनुवाद

    डॉ. आंबेडकरांच्या चिरकालीन प्रेरणेचा परिणाम

    रामचंद्र गुहा
    09 Nov 2019
    अनुवाद

    भाग्यवान तो देश ज्यास गौरवशाली इतिहास नाही!

    रामचंद्र गुहा
    29 Oct 2019
    अनुवाद

    गांधी विरुद्ध लेनिन: त्यांच्या काळात आणि आपल्या काळात

    रामचंद्र गुहा
    18 Oct 2019
    अनुवाद

    शहरे- गांधींना घडवणारी आणि गांधींनी घडवलेली

    रामचंद्र गुहा
    03 Oct 2019

    या आठवड्यातील लेख

    परिचय

    मुस्लीम मराठी साहित्याच्या दालनातील नव्या अभिव्यक्तीची कविता

    हरिश नवले
    22 Mar 2023
    ऑडिओ

    रभाजी कडलग

    संतोष पद्माकर पवार
    21 Mar 2023
    ऑडिओ

    'तात्पर्य'मधील पहिली कथा : आदर्श

    अवधूत डोंगरे
    20 Mar 2023
    लेख

    दलवाईंचा वैचारिक वारसा हेच मंडळाचे बलस्थान

    शमसुद्दीन तांबोळी
    19 Mar 2023
    Article

    It’s a Digital Dilemma Too

    Yogesh Borate
    17 Mar 2023
    व्हिडिओ

    'विज्ञानाने मला काय दिले?' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभातील भाषण

    विवेक सावंत
    10 Mar 2023
    व्हिडिओ

    डॉ. नरेंद्र दाभोलकर चित्र,शिल्प,कला प्रदर्शनात लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलेले भाषण 

    लक्ष्मीकांत देशमुख
    09 Mar 2023

    लोकप्रिय लेख इतर सर्व

    व्यक्तिवेध

    गुड बाय सानिया!

    आ. श्री. केतकर
    03 Mar 2023
    व्हिडिओ

    वैज्ञानिक सत्य

    विनोद शिरसाठ
    01 Mar 2023
    व्हिडिओ

    'धर्मरेषा ओलांडताना'च्या निमित्ताने हिनाकौसर खान यांच्याशी संवाद

    हिनाकौसर खान
    27 Feb 2023
    लेख

    भारतातील ट्रॅमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

    आ. श्री. केतकर
    24 Feb 2023
    लेख

    ‘बीबीसी’ आणि ‘फॉरेन हँड’!

    दिलीप लाठी
    23 Feb 2023

    साधना साप्ताहिकाचा ताजा अंक

    18 मार्च 2023 चा अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा..


    साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा

    साधना साप्ताहिकाचे डिटेल्स पाहण्यासाठी क्लिक करा...

    जाहिरात

    'केशवरावांच्या मुलाखती' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'देव तेथेचि जाणावा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'आम्हा घरी धन' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'असिधारा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'तीन संपादकांच्या मुलाखती' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'धर्मरेषा ओलांडताना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

    'सावध ऐका पुढल्या हाका' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    Tags

    • मुलाखत
    • दीर्घलेख
    • रिपोर्ताज
    • इंग्लिश
    • शेती
    • आरोग्य
    • शिक्षण
    • लेख
    • ऑडिओ
    • व्हिडिओ
    • विज्ञान
    • लेखमाला

    साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...

    वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1100, 2100, 3000 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
    020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.

    weeklysadhana@gmail.com
    • वर्गणी
    • जाहिरात
    • देणगी
    • प्रतिसाद
    • चौकशी
    • पॉलिसी
    • नियम आणि अटी

    © 2019, Evonix Technologies Pvt. Ltd All rights reserved

    कृपया आम्हाला अभिप्राय द्या

    Welcome :

    Search Here....