• gacor777
  • joker123
  • slot gacor
  • slot777
  • slot777
  • प्रजासत्ताकापुढचे चौथे संकट
    •  Home
    • राजकीय
    • सामाजिक
    • सांस्कृतिक
    • English
    • ऑडिओ
    • व्हिडिओ
    • संकीर्ण
    • आमच्याविषयी
    राजकारण अनुवाद

    प्रजासत्ताकापुढचे चौथे संकट

    • रामचंद्र गुहा
    • 27 Jan 2020
    • 5 comments

    1947 मध्ये भारत उभारणीच्या अतिशय प्राथमिक अवस्थेत होता, अशावेळी साहसींमधील साहसी उद्योजकदेखील भारतात गुंतवणूक करू धजले नसते, असे मी यापूर्वीही लिहिले आहे. इतर कोणतेही राष्ट्र याहून अधिक दुर्दैवी स्थितीत जन्माला आलेले नाही. देशाची फाळणी - तिच्यासाठी झालेली प्रचंड हिंसा आणि स्वतःच्या राहत्या घरातून झालेले अनेक जनसमूहांचे विस्थापन, यांमुळे परिस्थिती पुरेशी भीषण होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दोनच महिन्यांत पाकिस्तानने काश्मीरमध्ये हल्लेखोर पाठवून मोठ्या युद्धाची ठिणगी पेटवली. त्यानंतर, 1948च्या जानेवारीमध्ये एका हिंदू मूलतत्त्ववाद्याने राष्ट्रपित्याची हत्या केली. धार्मिकदृष्ट्या उजव्या विचारसरणीच्या गटाकडून झालेल्या या हल्ल्यापाठोपाठ लगेचच राजकीय डाव्या गटानेही दुसरा हल्ला चढवला. महात्म्याच्या निधनानंतर केवळ सहाच महिन्यांत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्यांच्या रशियन सर्वेसर्व्यांच्या आदेशाचे पालन करत भारतीय शासनव्यवस्थेविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले. अन्नटंचाई, विदेशी विनिमयातील घट आणि राजनैतिकदृष्ट्या अत्यंत मोठ्या व महत्त्वाच्या असणाऱ्या हैदराबाद संस्थानाने भारतीय संघराज्यात सामील होण्यास दिलेला नकार या सगळ्याचा तो परिपाक होता. 

    जवळजवळ अर्भकावस्थेत असणाऱ्या भारताने या सर्वाचा सामना कसा केला? त्यावेळच्या अनेक पाश्चिमात्य निरीक्षकांनी मोठ्या आत्मविश्वासाने वर्तवलेल्या अनुमानाप्रमाणे हा देश अनेक तुकड्यांत का विखुरला गेला नाही? याचे उत्तर देशाच्या त्यावेळच्या नेतृत्वाकडे असणाऱ्या असामान्य क्षमतांमध्ये दडलेले आहे. शासनयंत्रणेत हे नेतृत्व आंबेडकर, नेहरू, पटेल यांसारख्यांचे होते; तर नागरी समाजात ते कमलादेवी चटोपाध्याय, मृदुला साराभाई, अंनिस किडवई यांच्यासारख्यांचे होते. सुशिक्षित व एकचित्त तत्पर सार्वजनिक अधिकारी जोडीला होतेच. भारतीयांच्या या एका विलक्षण पिढीने हा देश राजकीयदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या संघटित केला. आणि ही एकता त्यांनी ज्या दस्तावेजाच्या स्वरूपात कायदेसंमत केली तिला आपण भारताची राज्यघटना म्हणतो. 

    राज्यघटना अंगिकारून भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना झाली, त्या घटनेचा काल 70वा वर्धापनदिन होता. या 70 वर्षांत हा देश - अगदी नवे राष्ट्र जन्माला येत असतानाच्या काळाइतके काळेकुट्ट दिवस पाहावे लागलेले नसतील तरीही, पूर्णतः संकटमुक्त आणि अडचणविरहीतही नव्हता. प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून कालक्रमणा करणाऱ्या या देशाला प्रामुख्याने तीन गंभीर संकटांना तोंड द्यावे लागले. त्यांचे वर्णन मी पुढे केले आहे.

    60च्या दशकातील सुरवातीच्या काळाने चीन आणि पाकिस्तान दरम्यान झालेली रक्तरंजित युद्धे आणि त्यापाठोपाठ झालेले दोन अत्यंत लोकप्रिय पंतप्रधानांचे मृत्यू या देशाने पाहिले. तसेच कृषी क्षेत्रातील असंतोष व त्याचे पर्यवसान म्हणून देशाच्या अनेक भागांत निर्माण झालेली दुष्काळसदृश स्थितीही पाहिली. 70च्या दशकाच्या मध्यात इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय यांनी भारतीय लोकशाहीला देशोधडीला लावले आणि - विशेषतः उत्तर भारतात - हुकूमशाही राजवट लादली, तो या देशातील दुसरा संकटप्रसंग होता. तिसरे संकट ओढवले ते 1989 ते 1992च्या दरम्यान. ही वर्षे हिंदू-मुस्लिमांच्या तसेच जातीपातींतील अंतर्गत संघर्षाने डागाळलेली होती. याच दरम्यान परकीय विनिमयातही टंचाई निर्माण झाली होती. केंद्रातील सरकारमध्येही अल्पावधीत मोठी उलथापालथ झाली होती.

    मला हे तीनही पेचप्रसंग अगदी ठळकपणे आठवतात. 1960 साली मी डेहराडूनमध्ये लहानाचा मोठा होत होतो. त्वेषाने धावून जाणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या जेट विमानांमुळे आमचे घर अंधाराने झाकोळून जात असे. आमची राहणी मध्यमवर्गीय असूनही धान्ये, डाळी आणि स्वयंपाकाचे तेल यांच्या टंचाईच्या झळा आम्हांला बसत होत्या. नेहरुंचा आणि शास्त्रींचा मृत्यू माझ्या पालकांना घरातल्याच एखाद्या सदस्याच्या जाण्याइतका जवळचा वाटत होता. 1970मध्ये मी दिल्लीमध्ये महाविद्यालयीन युवक होतो आणि सेन्सॉर केली जाणारी वृत्तपत्रे वाचत होतो. इंटेलिजन्स ब्युरोतील एक दाढीवाला इसम आम्हां विद्यार्थ्यांची संभाषणे बारकाईने न्याहाळत विद्यापीठाच्या कॉफी हाउसमध्ये बसलेला असे. त्याच्यापासून सावध राहून, तुर्कमान गेटवर झालेल्या मुस्लिमांच्या छळवणुकीच्या बातम्या मी ऐकत होतो. 1980 ते 90च्या दरम्यान मी अभ्यासासाठी उत्तर भारतात प्रवास करत होतो; आणि दरम्यानच्या वर्षांतील सामाजिक व धार्मिक ध्रुवीकरणाने घडवलेला विध्वंस प्रत्यक्षच पाहत होतो. त्यामुळे आता वयाच्या साठीत असणारा एक भारतीय नागरिक म्हणून मी सर्वप्रथम असे म्हणेन की, 'सद्यस्थितीत आपण जिथे आहोत, तिथे यापूर्वीही होतो.' 

    परंतु मी ज्याला आपल्या इतिहासातील सर्वाधिक वाईट वर्षे समजतो, ती वर उल्लेखलेल्या तिन्हींपैकी कोणतीही नाहीत. 1984 हे वर्ष मात्र निश्‍चितपणे तसे आहे. कारण या एका वर्षात देशाने (इतरही अनेक गोष्टींसह) भारतीय लष्कराने सुवर्णमंदिरात माजवलेली खळबळ, इंदिरा गांधींची हत्या, शिखांविरुद्धची कारवाई आणि भोपाळ दुर्घटना हे सारे अनुभवले आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, प्रजासत्ताक राष्ट्राच्या इतिहासातील चौथ्या गंभीर संकटातून सध्या आपण चाललो आहोत. काही अनावश्यक राजकीय धोरणांमुळे आर्थिक सुधारणांचे चाक रुळावरुन घसरले आहे. देशाच्या नागरिकांना परस्पर विरोधात उभे केले गेले आहे, आणि भारताच्या जागतिक स्थानाला त्याने हानी पोहोचवली आहे. मागील वर्षीच्या मे महिन्यामध्ये मोदी जेव्हा पुन्हा निवडून आले तेव्हा भारताला काही महत्त्वाचे संरचनात्मक प्रश्न भेडसावत होते. हे प्रश्न म्हणजे - 1. बेरोजगारी आणि कृषी क्षेत्रातील असंतोष, 2. सार्वजनिक संस्थांच्या क्षमतांमधील घसरण, 3. पर्यावरणाची वाढती अवनती. सरकारच्या 2019 नंतरच्या कोणत्याही कृतीने या तीन समस्यांपैकी एकीचेही निर्णायकरित्या समाधान केलेले नाही. उलटपक्षी, देशातील धार्मिक समूहांमधील तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामधील फटी रुंदावणाऱ्या सरकारच्या कृतींनी आधीच्या समस्यांच्याही पुढच्या काही समस्या निर्माण करून ठेवलेल्या आहेत. 

    70व्या वर्धापनदिनी भारताच्या सार्वभौम प्रजासत्ताकाचा हालहवाल काय आहे? मला वाटते की, आपले वास्तव्य कुठे आहे, यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून असेल. मी जर बरैली, गुवाहाटी किंवा श्रीनगरमध्ये असेन; तर माझ्या दृष्टीने परिस्थिती खरोखरच फार गंभीर असेल. कदाचित ती जीवावर बेतणारी आणि राष्ट्रासाठी धोकादायकदेखील असेल. पण बंगलोरसारख्या (मध्यम) शांततापूर्ण शहरात राहत असल्यामुळे, शिवाय स्वभावाने शंकेखोर व इतिहासकारही असल्यामुळे, 'इतक्यातच आपण संपूर्ण विनाशाकडे चाललो आहोत' असे काही मला वाटत नाही. तथापि मागील काही परिच्छेदांत नमूद केलेल्या मूलभूत संरचनात्मक समस्यांमुळे आणि सद्यस्थितीतील धोरणे ज्या पद्धतीने त्या समस्या अधिक बिकट करत चालली आहेत त्यावरून, मला खात्रीलायकरीत्या असे वाटते की, प्रजासत्ताकाच्या स्थापनेनंतरच्या 70 वर्षांमधील हा चौथ्या गंभीर संकटाचा काळ आहे. एखादा इतिहासकार भूतकाळाचा उपयोग वर्तमान समजून घेण्यासाठी करू शकतो, मात्र तो भविष्य वर्तवू शकत नाही. येत्या काही वर्षांनी किंवा या दशकाने भारताच्या आणि भारतीयांच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे, हे काही मी सांगू शकणार नाही, परंतु आपला देश त्याच्या इतिहासातील अतिशय संकटमय परिस्थितीतून चालला आहे हे स्पष्ट आहे; आणि त्यामुळेच, या संकटातून आपल्याला बाहेर काढू शकेल अशा एखाद्या प्रगल्भ नेतृत्वाचा अभावही अधिकच स्पष्ट होतो आहे.
    (अनुवाद - सुहास पाटील)

    - रामचंद्र गुहा, बेंगळूरू

    Tags: 70th republic day रामचंद्र गुहा प्रजासत्ताक दिन इंदिरा गांधी indira gandhi Load More Tags

    Comments:

    ugaonkar

    Very sad

    Jan 19, 2021

    Pro. Bhagwat Shinde

    कटू वास्तव मांडणी, विचार परवर्ती लेख.

    Feb 04, 2020

    Ravi Balasaheb Jagtap

    चिंताजनक आहे हे सगळं...

    Jan 29, 2020

    Sachin Karande

    संकट नेतृत्व तयार करते आणि ते लवकरच तयार होईल अशी आशा. मोदी ती संधी गमावत चालले आहेत. लोकांचा एवढा पाठिंबा असताना ते काही करू शकत नाहीत हेच ते दुर्दैव.

    Jan 28, 2020

    Subhash Athale

    राजकीय कायदे केल्यामुळे आर्थिक मंदी आली असे म्हणणे मला चूक वाटते. CAA चा फायदा उठवून विरोधी पक्षांनी रान उठवून राजकीय फायदा मिळवण्याचा देशविघातक प्रयत्न चालवला आहे. लोकसंख्या वाढ ही देशातील जवळपास सर्वच आजच्या समस्यांच्या मुळाशी आहे. ग्लोबल वाॅर्मिंगचे परिणाम या वर्षीच जाणवले असले तरी त्याची वाटचाल कडेलोटाकडे चालू आहे. या दोनही धोक्यांवरिल उपाययोजना मतदारांना नाराज करणार्‍या व येत्या निवडणुकांमध्ये अपयश देणार्‍या असल्याने कोणतेही लोकशाही राजकीय नेतृृृृत्व तो मार्ग स्वीकारण्यापेक्षा जगाचा सर्वनाश पत्करेल असे दिसते. त्यातल्या त्यात मतदारांचा रोष स्वाकारून जनकल्ल्याणाचे निर्णय धेण्याची व राबवण्याची क्षमता फक्त मोदींकडे दिसते, म्हणून थोडीशी आशा!

    Jan 27, 2020

    Add Comment

    संबंधित लेख

    अनुवाद

    कोरोनाचे संकट हाताळताना झालेल्या चुका मोदी सरकारला कशा सुधारता येतील?

    रामचंद्र गुहा 17 May 2020
    लेख

    गुजरात निवडणुकांमधील आभासी प्रचाराचा वास्तवातील अन्वयार्थ

    योगेश बोराटे 14 Dec 2022
    अनुवाद

    गांधी आजही प्रस्तुत ठरण्यामागची दहा कारणं

    रामचंद्र गुहा 27 Jan 2023
    लेख

    ‘बीबीसी’ आणि ‘फॉरेन हँड’!

    दिलीप लाठी 23 Feb 2023
    मुलाखत

    दोन पवारांची कर्तबगारी नेमकी किती?

    विनोद शिरसाठ 12 Dec 2019

    लेखकाचे इतर लेख

    अनुवाद

    प्रतिभावंताची प्रशंसा

    रामचंद्र गुहा
    10 Feb 2023
    अनुवाद

    गांधी आजही प्रस्तुत ठरण्यामागची दहा कारणं

    रामचंद्र गुहा
    27 Jan 2023
    लेख

    इयान जॅक यांना आदरांजली

    रामचंद्र गुहा
    05 Nov 2022
    अनुवाद

    राधाकमल मुखर्जी : पर्यावरण क्षेत्रातील अग्रणी

    रामचंद्र गुहा
    23 Oct 2022
    अनुवाद

    मुक्त विचाराचं भय

    रामचंद्र गुहा
    06 Oct 2022
    अनुवाद

    भारताची पंच्याहत्तरी : स्वतंत्र राष्ट्र, पण स्वतंत्र नसलेले लोक

    रामचंद्र गुहा
    24 Aug 2022
    अनुवाद

    एकपक्षीय वर्चस्वाबाबत राजाजी यांनी दिलेला धोक्याचा इशारा

    रामचंद्र गुहा
    26 Apr 2022
    लेख

    1971- आठवणींचा पेटारा

    रामचंद्र गुहा
    31 Aug 2021
    लेख

    युट्युबमुळे मला गवसलेला खजिना... 

    रामचंद्र गुहा
    02 Aug 2021
    अनुवाद

    सत्तेची मुजोरी आणि देशभक्तीचे विनयशील दर्शन

    रामचंद्र गुहा
    03 May 2021
    अनुवाद

    संग्रहालयांच्या आणि पुराभिलेखापालांच्या गौरवार्थ

    रामचंद्र गुहा
    27 Jan 2021
    अनुवाद

    संघ परिवार : एकाधिकारशाहीचा चेहरा असणारी एक सांप्रदायिक संघटना

    रामचंद्र गुहा
    29 Dec 2020
    अनुवाद

    काही आवडते ऑस्ट्रेलिअन क्रिकेटपटू

    रामचंद्र गुहा
    11 Dec 2020
    अनुवाद

    अदानी आफ्टर गांधी

    रामचंद्र गुहा
    28 Nov 2020
    अनुवाद

    ई. एस. रेड्डी : एक महान गांधी-कोश

    रामचंद्र गुहा
    24 Nov 2020
    अनुवाद

    ‘परेडस्’च्या प्रशंसेखातर

    रामचंद्र गुहा
    17 Oct 2020
    अनुवाद

    शास्त्रीजींकडून मोदींना काय शिकता येईल...

    रामचंद्र गुहा
    03 Oct 2020
    अनुवाद

    दुबळे पंतप्रधान अपायकारक,सामर्थ्यशाली पंतप्रधान अधिक अपायकारक!

    रामचंद्र गुहा
    20 Sep 2020
    अनुवाद

    1920 ची इटली आणि 2020 चा भारत यांच्यातील साम्यस्थळे

    रामचंद्र गुहा
    16 Sep 2020
    अनुवाद

    कोरोनाकाळात क्रिकेट पाहताना...

    रामचंद्र गुहा
    30 Aug 2020
    अनुवाद

    कॉंग्रेसमधील घराणेशाही त्या पक्षापेक्षा देशाला अधिक घातक

    रामचंद्र गुहा
    24 Aug 2020
    अनुवाद

    उज्ज्वल भारताच्या ऱ्हासाची कहाणी...

    रामचंद्र गुहा
    17 Aug 2020
    अनुवाद

    काश्मीर - भारताचे लाजीरवाणे सत्य

    रामचंद्र गुहा
    11 Aug 2020
    अनुवाद

    व्यक्तिनिष्ठ पंथांचा संक्षिप्त इतिहास

    रामचंद्र गुहा
    03 Aug 2020
    अनुवाद

    विवेकानंद आणि टागोर या दोघांशी मैत्र साधणारा स्कॉटिश

    रामचंद्र गुहा
    27 Jul 2020
    अनुवाद

    नरेंद्र मोदी हे इंदिरा गांधींपेक्षा अधिक धोकादायक का ठरतील...

    रामचंद्र गुहा
    20 Jul 2020
    अनुवाद

    आपली लोकशाही किती अवनत झाली आहे याचे चिन्ह !

    रामचंद्र गुहा
    12 Jul 2020
    अनुवाद

    1939 मध्ये बालाकोटला भेट देणाऱ्या गांधीवादी

    रामचंद्र गुहा
    04 Jul 2020
    अनुवाद

    भारतातील पत्रकारितेच्या स्वातंत्र्याची आजची संकटमय स्थिती

    रामचंद्र गुहा
    27 Jun 2020
    अनुवाद

    इतिहास मोदींना कठोरपणे पारखून घेईल...!

    रामचंद्र गुहा
    14 Jun 2020
    अनुवाद

    कदाचित आपले शास्त्रीय संगीत हाच आपल्या कडव्या राष्ट्रवादावरचा उतारा ठरू शकेल

    रामचंद्र गुहा
    06 Jun 2020
    अनुवाद

    आपल्याला सहा पदरी संकटाचा मुकाबला करायचा आहे

    रामचंद्र गुहा
    25 May 2020
    अनुवाद

    कोरोनाचे संकट हाताळताना झालेल्या चुका मोदी सरकारला कशा सुधारता येतील?

    रामचंद्र गुहा
    17 May 2020
    अनुवाद

    केंद्राकडून राज्यांची पिळवणूक

    रामचंद्र गुहा
    05 May 2020
    अनुवाद

    नवी दिल्लीच्या पुनर्निर्माणासाठीच्या प्रकल्पाचा वेडगळपणा आणि निरर्थकता

    रामचंद्र गुहा
    20 Apr 2020
    अनुवाद

    आपले मनोबल उंचावणाऱ्या दोन स्त्रिया

    रामचंद्र गुहा
    30 Mar 2020
    अनुवाद

    रणजी चषक आणि वृद्ध चाहत्यांच्या प्रेरक आठवणी

    रामचंद्र गुहा
    15 Mar 2020
    अनुवाद

    कॉंग्रेस अध्यक्षाची डेमोक्रेटिक निवड

    रामचंद्र गुहा
    09 Mar 2020
    अनुवाद

    माध्यमांनी दुर्लक्षिलेल्या दोन संस्था

    रामचंद्र गुहा
    24 Feb 2020
    अनुवाद

    अहमदाबादमध्ये गांधींसमवेत

    रामचंद्र गुहा
    08 Feb 2020
    अनुवाद

    प्रजासत्ताकापुढचे चौथे संकट

    रामचंद्र गुहा
    27 Jan 2020
    अनुवाद

    सी.ए.ए. अतार्किक, अनैतिक आणि कालविसंगत का आहे?

    रामचंद्र गुहा
    20 Jan 2020
    अनुवाद

    प्रजासत्ताकाची पुनर्प्राप्ती

    रामचंद्र गुहा
    06 Jan 2020
    अनुवाद

    कट्टरता ही विज्ञानासाठी हुकुमशाहीपेक्षाही अधिक घातक असते!

    रामचंद्र गुहा
    21 Dec 2019
    अनुवाद

    सांप्रदायिकता विरोधाचा इतिहास

    रामचंद्र गुहा
    07 Dec 2019
    अनुवाद

    धार्मिक दंगलींत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांचेही एक स्मारक असावे

    रामचंद्र गुहा
    24 Nov 2019
    अनुवाद

    डॉ. आंबेडकरांच्या चिरकालीन प्रेरणेचा परिणाम

    रामचंद्र गुहा
    09 Nov 2019
    अनुवाद

    भाग्यवान तो देश ज्यास गौरवशाली इतिहास नाही!

    रामचंद्र गुहा
    29 Oct 2019
    अनुवाद

    गांधी विरुद्ध लेनिन: त्यांच्या काळात आणि आपल्या काळात

    रामचंद्र गुहा
    18 Oct 2019
    अनुवाद

    शहरे- गांधींना घडवणारी आणि गांधींनी घडवलेली

    रामचंद्र गुहा
    03 Oct 2019

    या आठवड्यातील लेख

    परिचय

    मुस्लीम मराठी साहित्याच्या दालनातील नव्या अभिव्यक्तीची कविता

    हरिश नवले
    22 Mar 2023
    ऑडिओ

    रभाजी कडलग

    संतोष पद्माकर पवार
    21 Mar 2023
    ऑडिओ

    'तात्पर्य'मधील पहिली कथा : आदर्श

    अवधूत डोंगरे
    20 Mar 2023
    लेख

    दलवाईंचा वैचारिक वारसा हेच मंडळाचे बलस्थान

    शमसुद्दीन तांबोळी
    19 Mar 2023
    Article

    It’s a Digital Dilemma Too

    Yogesh Borate
    17 Mar 2023
    व्हिडिओ

    'विज्ञानाने मला काय दिले?' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभातील भाषण

    विवेक सावंत
    10 Mar 2023
    व्हिडिओ

    डॉ. नरेंद्र दाभोलकर चित्र,शिल्प,कला प्रदर्शनात लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलेले भाषण 

    लक्ष्मीकांत देशमुख
    09 Mar 2023

    लोकप्रिय लेख इतर सर्व

    व्यक्तिवेध

    गुड बाय सानिया!

    आ. श्री. केतकर
    03 Mar 2023
    व्हिडिओ

    वैज्ञानिक सत्य

    विनोद शिरसाठ
    01 Mar 2023
    व्हिडिओ

    'धर्मरेषा ओलांडताना'च्या निमित्ताने हिनाकौसर खान यांच्याशी संवाद

    हिनाकौसर खान
    27 Feb 2023
    लेख

    भारतातील ट्रॅमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

    आ. श्री. केतकर
    24 Feb 2023
    लेख

    ‘बीबीसी’ आणि ‘फॉरेन हँड’!

    दिलीप लाठी
    23 Feb 2023

    साधना साप्ताहिकाचा ताजा अंक

    18 मार्च 2023 चा अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा..


    साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा

    साधना साप्ताहिकाचे डिटेल्स पाहण्यासाठी क्लिक करा...

    जाहिरात

    'केशवरावांच्या मुलाखती' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'देव तेथेचि जाणावा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'आम्हा घरी धन' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'असिधारा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'तीन संपादकांच्या मुलाखती' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'धर्मरेषा ओलांडताना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

    'सावध ऐका पुढल्या हाका' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    Tags

    • मुलाखत
    • दीर्घलेख
    • रिपोर्ताज
    • इंग्लिश
    • शेती
    • आरोग्य
    • शिक्षण
    • लेख
    • ऑडिओ
    • व्हिडिओ
    • विज्ञान
    • लेखमाला

    साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...

    वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1100, 2100, 3000 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
    020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.

    weeklysadhana@gmail.com
    • वर्गणी
    • जाहिरात
    • देणगी
    • प्रतिसाद
    • चौकशी
    • पॉलिसी
    • नियम आणि अटी

    © 2019, Evonix Technologies Pvt. Ltd All rights reserved

    कृपया आम्हाला अभिप्राय द्या

    Welcome :

    Search Here....