दिल्ली हुई 'आप'से दूर...

दिल्ली विधानसभा निवडणूक - काय घडले? का घडले?

अर्थसंकल्प आला. निर्मलाताईंनी षटकार मारला. बारा लाख रुपयापर्यंत इन्कम टॅक्स सूट जाहीर झाली, आणि दिल्लीमधील सरकारी कर्मचारी आणि इतर कॉर्पोरेटमध्ये काम करणारे लोक आपसूकच भाजपचे विधानसभेसाठीसुद्धा मतदार झाले. तसंही मोदी-शहा सरकारने आपच्या आर्थिक नाड्या बंद केल्या होत्या. आणि भाजपचा निवडणूक फार्म्युला ठरलेला होता. कुठल्याही परिस्थितीत त्यांना दिल्ली काबीज करायची होती. 

एक काळ होता. 
अण्णा दिल्लीत आले. 
आंदोलन सुरु झालं. 
इंडिया अगेन्स्ट करप्शन! 
लोक अक्षरशः वेडे झाले. 
त्यांच्या नादाला लागले. 
अनेक इंजिनिअर, डॉक्टर, पत्रकार, कवी, 
लेखक, प्राध्यापक, प्रोफेशनल्स, पोलीस अधिकारी, 
मिलिटरीवाले, इतर व्यावसायिक - 
सगळ्यांनी आपापल्या नोकऱ्या सोडल्या. 
कामधंदे सोडले. 
आपल्याला देश बदलायचा आहे. 
ही राजकीय व्यवस्था बदलायची आहे. 
हे पक्कं ठरवलं.   
जोपर्यंत 'कॉंग्रेसविरोध' एवढाच कार्यक्रम होता, 
तोपर्यंत अण्णा सोबत होते. 
===============
पण त्यांचाच शिलेदार अरविंद केजरीवाल 
महत्वाकांक्षी झाला, 
भाजपला मदत करत बसण्यापेक्षा 
आपणच पक्ष स्थापन करू, 
आपणच सत्ता स्थापन करू, 
असं म्हणू लागला, तेव्हा अण्णा चिडले. संतापले. 
हे काही आपलं काम नाही, असं बोलू लागले.  
आपला विरोध दाखवला. 
आणि हळूच बाहेर पडले. 
आपल्या गावी आले. 
निवांत बसले.  
===============
पुढे आम आदमी पार्टीची स्थापना झाली. 
आणि त्या पक्षाचा नेता बनला एकेकाळी 
इन्कम टॅक्स कमिशनर असलेला अरविंद केजरीवाल.  
पण गबाळे कपडे, पायात चप्पल, 
कार्यकर्त्यांनी दिलेली छोटीशी मारुती कार, छोटंसं घर 
आणि व्हीआयपी कल्चरला विरोध दाखवत 
सामान्यातला अ(ति?)सामान्य अशी प्रतिमा निर्माण झाली. 
=== 
आपल्याला सगळं काही बदलायचं आहे, 
हे स्वप्न पाहत प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण, 
सिफोलॉजिस्ट योगेंद्र यादव, आयपीएस अधिकारी किरण बेदी, 
कवी कुमार विश्वास, पत्रकार आशुतोष, शाजिया इल्मी असे 
कितीतरी रथी - महारथी सोबत आले. 
आपली भूमिका काय असावी, 
व्हिजन काय असावे, 
मिशन काय असावे, 
अशा बाबींवर चर्चा करू लागले. 
अभ्यास करून टिपणे तयार करू लागले. 
ब्ल्यू प्रिंट, प्लान ऑफ अ‍ॅक्शन तयार करू लागले. 
पण हळूहळू त्यांच्या लक्षात आले की, 
अशा कुठल्याच गोष्टी हा माणूस ऐकत नाही. 
त्याला जे करायचे आहे तोच ते करतो. 
आपण एका कट्टर हुकुमशाही वृत्तीच्या व्यक्तीच्या 
नादाला लागलोय आणि 
‘क्रिमिनल वेस्टेज ऑफ टाइम’ करत आहोत. 
===============
आपण भ्रष्टाचार संपवण्यासाठी आलोय, 
आपण राजकारणातील गुन्हेगारी संपवण्यासाठी आलोय, 
आपल्याला ही सडलेली व्यवस्था बदलायची आहे, 
या गोष्टींना काही अर्थ राहिला नाही. 
ज्या व्यक्तीच्या विरोधात 
यांनीच भ्रष्टाचाराची तक्रार केली होती 
त्यालाच अरविंदने तिकीट दिले. 
गुन्हेगार, भ्रष्टाचारी, अतिश्रीमंत लोकांना 
पदे देण्यात येऊ लागली. 
काही बोलायला गेले तर 
‘तुम्हाला राजकारण कळत नाही’ 
असं बोलण्यात येऊ लागले. 
===============
मग काय? 
हळूहळू एकेक व्यक्ती अरविंदची साथ सोडू लागले. 
पण दिल्लीच्या सामान्य जनतेपर्यंत 
या आतल्या बातम्या पोचत नव्हत्या. 
आम आदमी पार्टी चे सरकार बनत होते. 
अरविंद केजरीवाल एकदा नाही, दोनदा नाही, 
तर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनत होते. 
त्यांचे धोरण यशस्वी होत होते. 
शाळा, मोहल्ला क्लिनिक, वीज बिल माफ 
वगैरे गोष्टींची चर्चा घडवून आणली जात होती. 
===============
केजरीवालने आपल्या पक्षाचे ध्येयधोरण ठरवताना 
भाजपचा हिंदुत्ववादी मतदार समोर ठेवला होता. 
आरएसएसच्या गुड बुक्स मध्ये 
राहायचं ठरवलेलं होतं. 
त्यामुळेच सतत गांधीजींचं नाव घेत 
सुरु झालेल्या आंदोलनातून 
निर्माण झालेल्या या पक्षाने 
आपलं सरकार आल्याबरोबर 
महात्मा गांधीजींचा फोटो काढला. 
संदेश होता गोडसेबद्दल सुप्तपणे आदर बाळगणाऱ्या लोकांसाठी. 
हे करत असताना फक्त बाबासाहेब आंबेडकर आणि 
भगतसिंग यांचे फोटो लावायला सुरुवात केली.
ज्यामुळे दलित मतदार आपल्याकडे येईल असे नियोजन. 

असं असलं तरी यासोबतच धार्मिक तीर्थयात्रांचे आयोजन, 
हनुमान मंदिर भेट, जाहीर हनुमान चालीसा वाचन, 
एवढेच नाही तर चलनी नोटांवर हिंदू देव देवतांचे चित्र टाका, 
अशी मागणी करायला सुरुवात केली. 
आता बाबासाहेबांचे हिंदू कर्मकांडाबद्दल असलेले विचार, 
आणि शहीद भगतसिंग यांचे नास्तिक तत्वज्ञान 
आणि त्यांचे फोटो लावून 
केजरीवाल यांच्याकडून केली जाणारी कृती 
यांचा कुठेच ताळमेळ लागत नव्हता. 
हे प्रकरण एक दिवस उलटणारच होते. 
===============
पुढे सत्तेत आल्यानंतर पैसा मिळवणे आणि 
मोठ्या प्रमाणावर निवडणुकांसाठी खर्च करणे सुरु झाले.  
त्यामुळे भारतात कुठल्याही राज्यात निवडणुका असतील 
तेथे केजरीवाल जाऊ लागले. 
मग गोवा असेल, गुजरात असेल, हरियाना असेल 
प्रत्येक राज्यात जाऊन कॉंग्रेसची मते खाणे आणि 
मोदीजींच्या ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ योजनेसाठी मदत करणे, 
जोरात सुरू झाले. 
भाजपला हे हवेच होते. 
पण किती काळ?
(द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रात 9 फेब्रुवारी 2025 ला प्रसिद्ध झालेले सौम्यदीप सिन्हा यांचे व्यंगचित्र)

मोदी-शहांच्या डोळ्यात मात्र 
या छोट्याशा राज्यात आपल्या नाकासमोर बसलेला 
मुख्यमंत्री टोचत होता. 
त्यांना तेथे आपला माणूस पाहिजे होता. 
सुरुवातीला त्यांनी उपराज्यपाल हे हत्यार वापरले. 
सतत कामात अडथळे आणले. 
पण बोंबाबोंब करण्यात पटाईत असलेले केजरीवाल 
मोदी-शहांना पुरून उरले. 
मग एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. 
लोकांच्या हृदयात बसलेली अरविंद केजरीवाल यांची 
कट्टर इमानदार असलेली प्रतिमा.  
यांना जर हटवायचे असेल तर 
त्यांची ती प्रतिमा कुस्करायला पाहिजे. 
लगेच त्या दृष्टीने काम सुरू झाले. 
===============
आम आदमी म्हणून छोट्याशा कारमध्ये फिरणारे केजरीवाल 
गाड्यांचा मोठा ताफा घेऊन फिरू लागले. 
व्हीआयपी कल्चर नको म्हणत म्हणत 
पंजाब पोलीस आणि दिल्ली पोलीस अशी 
‘डबल हाय सिक्युरिटी’ व्यवस्था लोकांसमोर येऊ लागली. 
दोन खोल्यांच्या छोट्याशा घरात राहणार, 
असे सांगणारे केजरीवाल सरकारी पैशाने भव्य दिव्य असा 
अलिशान शीशमहल तयार करू लागले.  
नंतर ‘शराब घोटाळा’ समोर आला. 
शेकडो कोटी रुपयांचे गैरव्यवहार समोर आले. 
इडी, सीबीआय, एसआयटीची कटकट सुरु झाली. 
एकामागून एक मंत्री जेलमध्ये जाऊ लागले. 
स्वतः केजरीवाल यांनाही अटक झाली. 
‘कट्टर इमानदार’ या प्रतिमेचे तुकडे तुकडे होऊ लागले. 
त्यात मोदीजींनी ‘रेवड्या’ म्हणून हिणवलेल्या 
केजरीवालच्या ‘फ्री योजना’ देण्याचे भाजपनेही जाहीर केले 
आणि 
‘हा माणूस नसला तरी चालतंय, काही फरक पडत नाही’ 
असं तिथल्या लाभार्थ्यांना वाटू लागलं. 
त्याचवेळी अर्थसंकल्प आला. 
निर्मलाताईंनी षटकार मारला. 
बारा लाख रुपयापर्यंत इन्कम टॅक्स सूट जाहीर झाली, 
आणि दिल्लीमधील सरकारी कर्मचारी आणि 
इतर कॉर्पोरेटमध्ये काम करणारे लोक 
आपसूकच भाजपचे विधानसभेसाठीसुद्धा मतदार झाले.  
तसंही मोदी-शहा सरकारने 
आपच्या आर्थिक नाड्या बंद केल्या होत्या. 
आणि भाजपचा निवडणूक फार्म्युला ठरलेला होता. 
कुठल्याही परिस्थितीत 
त्यांना दिल्ली काबीज करायची होती. 
केजरीवालच्या योजनांना ‘फुकटच्या रेवड्या’ म्हणून 
स्वतः मोदीजींनी हिणवलेले असले तरी 
त्या सर्व रेवड्या आम्ही पण वाटू, 
असे जाहीर करण्यात आले.


हेही वाचा - काम की राजनीती काम करेगी? (केदार देशमुख)


आपच्या प्रत्येक चाली यशस्वी झालेल्या होत्या. 
दिल्लीत तीन वेळा सरकार आले आणि 
पंजाबमध्येसुद्धा बहुमत मिळाले 
राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली 
म्हणून केजरीवाल यांची महत्त्वाकांक्षा वाढतच होती. 
त्यांना देशाचे पंतप्रधान व्हायचे होते. 
आपल्याशिवाय भारतीय राजकारणात कुणीही 
मोठी व्यक्ती नाही, याबद्दल त्यांच्या मनात शंकाच नव्हती. 
राजकारण बदलण्याची ताकद फक्त आपल्यामध्येच आहे, 
असं त्यांना नेहमीच वाटत होते. 
===============
त्यामुळे दिल्ली निवडणुकीत 
दोन चार जागा कॉंग्रेसला देऊन 
‘इंडिया आघाडी’चे सामूहिक नेतृत्व स्वीकारावे, 
असे त्यांना प्रशस्त वाटले नाही. 
याउलट त्यांनी कॉंग्रेसला ताटकळत ठेवले. 
राहुल गांधींचा फोटो भ्रष्टाचारी म्हणून प्रसिद्ध केला. 
आघाडीच्या सर्वात मोठ्या पक्षाला म्हणजे कॉंग्रेसला 
इंडिया आघाडीतूनच बाहेर काढा, अशी मागणी केली. 
थोडक्यात इंडिया आघाडीचे नेतृत्व स्वतःकडे घेऊन 
भविष्यात पंतप्रधान होण्याचे स्वप्न परत जिवंत केले.
===============
दिल्लीची जनता काहीही झालं तरी 
आपल्यालाच निवडून आणील, हे त्यांचं पक्कं मत होतं. 
पण मोदी-शहांच्या भाजपला आपला दिल्लीतील 
सत्तावीस वर्षांचा वनवास संपवायचा होता. 
शेवटी झालेही तसेच. 
आम आदमी पार्टीच्या हातातून भाजपने सत्ता हिसकावून घेतली. 
स्वतः केजरीवाल आणि त्यांचे महत्त्वाचे मंत्री 
आपली आमदारकीसुद्धा वाचवू शकले नाही. 
आणि रस्त्यावरील आंदोलनातून निर्माण झालेला पक्ष 
परत रस्त्यावर आला. 
===============
आज केजरीवाल यांची परिस्थिती एकदम कठीण आहे. 
निवडणुकीचे निकाल लागले - नाही लागले की पहिली घोषणा झाली, 
ती विधानसभा आणि मंत्रालय सील करण्याची. 
कोणतीही कागदपत्रे बाहेर जाणार नाही याची. 
एसआयटी स्थापन करायची. 
म्हणजे आधीच इतके दिवस जेलमध्ये काढलेले केजरीवाल 
काही दिवसांतच पुन्हा जेलमध्ये जाऊ शकतात. 
भ्रष्टाचाराची अनेक प्रकाराने समोर येऊन 
दिल्लीत मोठा धुराळा उडू शकतो. 
===============
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पंजाबमधील 
आम आदमी पार्टीच्या सरकारला सुरुंग लावला जाऊ शकतो. 
तसेही मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांचे रूपांतर 
कधीही एकनाथ शिंदेमध्ये होऊ शकते. 
भाजपचा तो अगदी यशस्वीपणे वापरलेला फॉर्म्युला आहे. 
तसे झाले तर मात्र खऱ्या अर्थाने केजरीवाल रस्त्यावर येतील. 
===============
यांपैकी काहीच झाले नाही तर मात्र 
दिल्लीमध्ये आपल्याला 
एक अतिशय आक्रमक विरोधी पक्ष पाहायला मिळेल. 
जी आश्वासने भाजपने दिल्लीच्या मतदारांना दिलेली आहेत 
ती आश्वासने पूर्ण करणे तितके सोपे नाही. 
त्यासाठी केजरीवाल आणि कंपनीने ठरवले तर 
मोदी-शहा यांचे जगणे मुश्किल करू शकतील. 
===============
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 
कॉंग्रेससारख्या पक्षाला इंडिया आघाडीतून काढण्याची योजना रद्द होईल.  
भाजप विरोधी मतांचे विभाजन होणार नाही.  
भाजपला परत-परत सत्तेवर येण्याचा मार्ग काटेरी होईल. 

कारण मोदीजींनी दिलेला मंत्र आणि त्याचे महत्व 
सर्वच विरोधी पक्षांच्या लक्षात आलेले असेल. 

तो मंत्र आहे 
‘एक हैं तो सेफ हैं!’

-दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com
(लेखक, वसुधा रिसर्च अँड पब्लिकेशन्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि ज्ञानज्योती या नियतकालिकाचे संपादक आहेत.)

Tags: केजरीवाल अरविंद केजरीवाल दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 Load More Tags

Comments: Show All Comments

Mahendra Patil

very good analysis https://mahendrapatil1210.blogspot.com/2025/02/blog-post.html

Satish Inamdar

मुद्देसूद लेख .यावेळी बीजेपी ला दिल्लीत काम व सुधारणा दाखवून दिलीच पाहिजे.

Nitin Mane

Sir, tyani Congress barobar jayala pahije hote. Tyancha ahankar nadla.tyamule tyancha seat pan kami zalya.

Dr. BS Valke

प्रिय दिलीप जी आपला लेख सुसंगत व वस्तुनिष्ठ माहिती देणारा आणि वाचकाला विचारात पाडणारा आहे. फक्त formal education च्या यशाचा डंका मिरवणारी आणि उच्च पदासाठी सोकावलेली माणसं या देशात कुठलाही बदल करु शकत नाही हे आता सिद्धं झालेलं आहे स्वतः मध्ये वेळोवेळी योग्य बदल करण्याची पात्रता असणं ही समाज बदलाची स्वप्न पहाण्यासाठी ची precondition असते. अशी कुवत नसलेल्या संघटनशून्य व्यक्तींनी BJP शी टक्कर घेणं म्हणजे महाकाय काळ्या कातळावर डोकं आपटण्यासारखं आहे. शिवाय चूक/बरोबर पण निश्चित अशी वैचारिक बैठक असणं आणि क्षुल्लक घटनांनी डळमळीत न होता त्यासाठी ठामपणे उभं राहून संघटित लढा देण्यासाठी आवश्यक ती शस्त्रं तयार ठेवणं हे झाल्यावर विजयाची अपेक्षा करता येऊ शकते. देशात बदल घडवून आणण्याची इच्छा करणार्यांनी BJP ला समजून घेणं गरजेचं आहे. जगातील एक अत्यंत सशक्त व निश्चित दिशेने अव्याहत वाटचाल करणारी RSS ही BJP ची खरी शक्ती आहे. BJP हा RSS ची त्यांना हवा असलेला बदल घडवून आणण्याचा राजकीय वाटाड्या आहे. १०० वर्षांपूर्वी हेडगेवारांनी स्वप्न पाहिलं की " हिंदूंची " ही शिस्तबद्ध संघटना आज नाही तर शंभर वर्षांनी गल्लीतून दिल्लीला जाईल आणि भारतावर हिंदू राष्ट्राचा ध्वज फडकवेल. या संघटनेतून तयार झालेले राज्यकर्ते साम दाम दंड अश्या सर्व ताकदीनिशी केजरीवाल सारख्या शंभरजणांची सहज वाट लावू शकतात. तोपर्यंत तुम्ही आम्ही आपली राज्यघटना, आपला तिरंगा, आपली वैज्ञानिक दृष्टी आणि आपल्या जातीपाती कुरवाळत एक एकटे आप आपल्या तलवारी पाजळत बसू यात. सध्या तरी राज्यकर्ते जनतेला महाकुंभाच्या पवित्र पाण्यात न्हाऊ घालून, रेवड्या खाऊ घालताहेत. हळूहळू धर्माची अफू पाजून जरा डोळ लागायचा उशीर की त्यांना जे करायचं ते करणारच. आणि त्यांना कोण मातीचा लाल रोखणारये? डाॅ बी एस वाळके

Dr Arun Dike

निवडणुका जिंकल्या जात आहेत पण दर रोज होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्येमुळे देश दर घडीला हारत आहे.

Dr Arun Dike

लेख छानच आहे पण खरं तर भारताच्या सर्व राजनीतिक दलांचं शहरी नियोजनमधे लक्षघालुन ग्रामीण भारतीयंना मनरेगा किंवा लाडक्या बहिणीला नगदी पैसे देवुन बाज़ार वाढणारे नियोजन सांगतात की भारताच्या सजीव मातीचा या दलांना विसर पडला आहे.जगभर अन्नाचा इतका तुटवडा आहे की तिथे आता प्रोटीनसाठी लोक कीड़े मुंग्या खाउ लागले आहेत(द हिंदू वर्तमानपत्र रविवार मैगज़ीन ९ फेब्रुवार).कृषितज्ञ दाभोलकरांचं Plenty for all पुस्तक सिद्ध करतं की जगभर अन्न पुरवण्याची ताक़त भारताच्या मातीत आहे.त्या शेतकर्याना बहुपिक ही आपली पारंपरिक कृषि सोडुन नकदी पिकांच्या नादी लावणार्या सर्व कृषि विद्यापीठांनी नासवलं.राजकीय दलांनी त्यांनी पैसे द्यायचे म्हणजे नदीत आपल्या नळाचं पाणी सोडण्या सारखं आहे. आपण पारंपरिक शेती व गॉंव सशक्त करणं काऴाची गरज आहे.

अशोक चासकर

दिलीपजी आपली मत अतिशय स्पष्ट व वास्तवतेला धरून आहेत. खरतर भारतीय राजकारणाची राजकीय पक्ष व पुढाऱ्यांनी पार खिचडी करुन टाकली आहे. सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम ही मंडळी करत आहे. त्यांच्या बदलणाऱ्या “आयडिऑलॉजिज” या स्वार्थाने बरबटलेल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनता गोंधळली आहे….चांगले कोण आणि वाईट कोण हे कळण्याअगोदरच ही मंडळी आपला स्टँड बदलतात… थोडक्यात सर्वांनी लोकशाहीला सलाईनवर आणले आहे. यांना समाज्यात गोंधळ निर्माण करुन लोकांना दिशाहीन करावेसे वाटते…..समाज्याचा विकास आम्ही करत आहोत असा अभास निर्माण करुन जनतेची दिशाभूल करण्यात ते धन्यता मानतात…खरतर वास्तव असे आहे “ पुढाऱ्यांचा विकास आणि जनता भकास” दिलीपजी तुमचे निरीक्षण अतिशय योग्य व वास्तव आहे पण जोपर्यंत जनता अज्ञानी आहे तोपर्यंत हे असेच वागणार.

Nitin Kottapalle

मुळात अण्णा आणि इतर वावदूक विदूषकांची सर्कस 2014 नंतर ज्या पद्धतीने बंद झाली, ती पाहता हे आंदोलनच भाजपची सत्ता येण्यासाठी वापरलेले हत्यार होते हे सहजच लक्षात येते. भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा ही इतकी ढोबळ गोष्ट आहे की त्यासाठी कुठल्याही विचारधारेचे किंवा राजकीय तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान लागत नाही. अर्थात, हे सर्व लोक छुप्या पद्धतीने उजव्याच विचारधारेचे असल्याचे नंतर वारंवार सिद्ध होत गेले. कार्यालयातून गांधीजींचा फोटो हटवणे, नोटेवर लक्ष्मीचे चित्र छापायची मागणी करणे वगैरे बाष्कळपणा ही त्याचीच उदाहरणे. केजरीवाल सत्तेवर आले काय आणि भाजप सत्तेवर आले काय, मूलभूत फरक काहीच पडणार नाही हे उघड आहे. भौतिक सुख सुविधांचे प्रलोभन दाखवून विषारी विचारधारा पुढे रेटायचे काम चालूच राहील. भाबडी जनता विकासाच्या नावाखाली फसत राहील. केजरीवालांच्या कारकिर्दीचा आणि भविष्यकालीन शक्यतांचा सुंदर आढावा घेणाऱ्या या लेखाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन!

Suraj Khavate

नेहमीप्रमाणे एक चांगला विषय आणि परिपूर्ण अवलोकन केलंत लाठी साहेब. एक चारित्र्य संपन्न सरकारी अधिकारी जो भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतो, तुमच्या आमच्या सारखाच सामान्य आहे अश्या माणसाची राजकारणाला गरज होती म्हणून लोकांनी यांना डोक्यावर घेतलं. सुरुवातीचा बराच काळ यांनी खूप चांगलं काम केलं, सामान्यांसाठी चांगल्या आरोग्य, शैक्षणिक, मूलभूत योजना आणल्या. आणि मग पुन्हा लोकांनी निर्विवाद निवडून दिल्यावर ती हवा डोक्यात गेली.. कभी कभी लगता है की आपण ही भगवान है.. असं वाटू लागलं, इगो दिसू लागला आणि अधोगती चालू झाली.. बाकी काँग्रेस असो वा भाजप, त्यांना स्वतःच अस्तित्व टिकवायचं होत किंबहुना सत्ता स्थापन करायची होती म्हणून त्यांनी कोणतीच कसर सोडली नाही. आणि व्हायचं ते झालं.. हा पराजय म्हणजे आप चा अंत नाही. पण यातून केजरीवाल बोध घेतील का हे पाहणं महत्वाचं ठरतं.

Anup Priolkar

Eye opener article. Distance between voter, general reader and cruked politician is beyond imagination .

Prashant Dindokar

अभ्यासपूर्ण लेख.. मुळात किसन हजारे नावाचा हा विदूषक संघाचा माणूस आणि केजरीवाल यांचा ओढा सुद्धा संघ परिवार कडेच.... आधी ते मुद्दाम गबाळे कपडे, चप्पल, मफलर आणि साधी राहणीमान दाखवून सामान्य लोकांचा Blue Eyed boy बनल्यावर बऱ्यापैकी वागणुकीत बदल झाला.. हेकडपणा, गर्विष्ठ आणि मीच एकटा या वृत्तीमुळे जुने सहकारी जे तसेही भाजप वालेच होते सोडुन गेले... मुळात यांचे एकच मिशन होते काँग्रेसचा खातमा .. आता श्री प्रकाश आंबेडकर ज्यांच्यावर सुद्धा भाजपची B टीम असल्याचा आरोप होतो त्यांनी दिल्लीतील निकाल पाहून काँग्रेस ला बी टीम म्हणणे हे केजरीवालच्या पथ्यावर पडले.... आता दुसरे हुकूमशहा जर आप चे नामोनिशाण मिटवायचे ठरवून उतरले तर केजरीवाल आणि टीम पुन्हा जेल मध्ये जाणार हे 1000 टक्के ठरले आहेच.. राहता राहता INDIA आघाडी फुटेल की शाबूत राहील हे त्या घटक पक्षांच्या EGO वर ठरेल. राहुल गांधी एकटेच लढत आहेत उगाच त्यांना आघाडी ने नावं ठेवून स्वतःची तिरडी बांधू नये

डॉ अनिल खांडेकर

श्री दिलीप लाठी यांच्याशी सहमत आहे . व्यक्तीनिष्ठ राजकारणाला , अशा व्यक्ती वादी पक्षाला नेहमीच विरोध केला पाहिजे . " एक है तो सेफ है " चा नारा लोकशाही विरोधी आहे . पंत प्रधान मोदी किंवा केजरीवाल किंवा अन्य कोणालाही व्यक्तिवादी राजकारण करणार्यांना विरोधच केला पाहिजे . केजरीवाल यांनी नागरिकत्व संबधित कायदे , शाहीन बाग आंदोलन , दिल्लीतील हिंसाचार , शेतकरी कायदे --- कोठेही रोखठोख भूमिका घेतली नाही . एका व्यक्तीच्या तथाकथित करिष्म्याच्या वर देशाचे गुंतागुंतीचे प्रश्न समजणे आणि त्यासाठी उपाय योजना करणे -- कठीण आहे. त्यात केजरीवाल आणि इतर कोणाकडेही कुवत दिसली नाही . दहा वर्षात आरोग्य शिक्षण , नदी --यमुना नदी स्वच्छता -- पुढे काय झाले ? त्अयांनी नेक ठिकाणी निवडणुका लढविल्या आहेत . एवढा पैसा -- हे मोठे प्रश्न चिन्ह आहे . ... आपच्या पराभवाचे दुक्ख नाही . पण भाजप अधिकाधिक सोकावत जाणार !

Add Comment

संबंधित लेख

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://econtract.ish.co.id/ https://tools.samb.co.id/ https://orcci.odessa.ua/ https://febi.iainlhokseumawe.ac.id/